एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सुरुवात! केएलने केले रोहीत आणि विराटच्या जोडीचे कौतुक

मुंबई: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वनडे सामना जिंकला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीबाबत एक मोठं वक्तव्य राहुलने केले आहे. ज्याबद्दल चर्चांना जोर आला आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही भारताचे नेतृत्व केले असताना गौतम गंभीरने त्यांना कसोटी क्रिकेटपासून लांब ठेवले आहे. त्यामुळे आता फक्त वनडे क्रिकेट खेळणे हे त्यांच्या हातात आहे. तरीसुद्धा विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सातत्याने दमदार कामगिरी करत आहेत. गेल्या सामन्यात रोहित आणि विराट यांनीच भारताला सहजपणे विजय मिळवून दिला होता. आजच्या वनडे सामन्यात जर विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळले नसते तर भारताचे काय झाले असते, याचा विचारही न केलेला बरा असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामना संपल्यावर भारताचा हंगामी कर्णधार केएल राहुलने या दोघांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.


केएल राहुल सामना संपल्यावर म्हणाला की, "रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकत्र क्रिकेट खेळताना पाहणे ही एक मेजवानी असते. मी यापूर्वी काही वेळा त्यांना एकत्र खेळताना पाहिले आहे. पण आजही त्यांना जेव्हा एकत्र फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा नजर त्यांच्यावरून हटत नाहीत. दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे कधी नेमकं काय करायचं, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा जेव्हा खेळत असतात तेव्हा समोरचे प्रतिस्पर्धी किती मुर्ख वाटतात. कारण रोहित आणि कोहली दाखवून देतात की, ते नेमके कोण आहेत, त्यांनी केवढं मोठं स्थान मिळवलं आहे. ड्रेसिंग रुममध्येही जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा त्यांचं वागण आनंद देणारं असतं."



केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवला. यामुळे मालिकेत त्यांनी १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराट आणि रोहीतसह हर्षित राणानेही चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला त्याने चांगल्या विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादवनेही नेहमीप्रमाणे च त्याचे काम चोख बजावले आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजीही मोलाची ठरली.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या