अपात्र गिरणी कामगारांनाही म्हाडाची घरे मिळणार!

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत


मुंबई : कागदपत्रांमधील त्रुटीमुळे म्हाडाचे घर मिळविण्यासाठी अपात्र ठरलेल्या गिरणी कामगारांना व त्यांच्या वारसांना आता आपल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ३१ डिसेंबरपर्यंत म्हाडाकडे करता येणार आहे. कामगार आयुक्तांनी त्याबाबत म्हाडाला निर्देश दिले असून त्याचा थेट फायदा सात हजारांहून अधिक कामगारांना होऊ शकणार आहे.


गिरणी कामगारांना अल्प किमतीत हक्काचे घर देण्याची योजना राज्य सरकारने २००० मध्ये जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरातील ५८ बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीत यशस्वी न झालेल्या सुमारे दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’ने अभियान सुरू केले होते. त्यानुसार १ लाख आठ हजार ५५० अर्जदारांनी अर्ज केले असून त्यातील ९९ हजार ९३७ अर्जदार पात्र ठरले आहेत.


कागदपत्रांमधील त्रुटींमुळे सात हजार कामगार अपात्र ठरले आहेत. या कामगारांना आवश्यक कागदपत्रे जोडून देण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून कामगार आयुक्तांकडे गिरणी कामगार संघटनांनी केली होती. वेळेत कागदपत्रे न मिळाल्याने सादर करण्यास विलंब झाला होता, त्यांना आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिळणार आहे.


गिरणी कामगारांना एसएमएसद्वारे माहिती


म्हाडाने दिलेल्या मुदतीत ज्या गिरणी कामगारांना दिलेल्या कालावधीत कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत, अशा गिरणी कामगार, वारसांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत विशेष संधी द्यावी व त्या अानुषंगाने पोर्टलमध्ये बदल करावेत, असे आदेश कामगार उप आयुक्तांनी म्हाडाला दिले आहेत. या मुदतवाढीची माहिती संबंधित गिरणी कामगार आणि वारसांना एसएमएसद्वारे द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या खरेदीसाठी संस्थांच्या उड्या; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर आकारला जाणार

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलजल प्रक्रिया

अनाया बांगरचा शस्त्रक्रिया करत मोठा निर्णय, देशातील पहिलंच प्रकरण नेमकं काय?

मुंबई: माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनायाचा

अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना मोठा दिलासा

लातूर : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता राज्य सरकारी

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील