महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष अनारक्षित गाड्या

मुंबई : मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांसाठी ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत १५ विशेष अनारक्षित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील नागपूर, नाशिक, वर्धा या विविध जिल्ह्यातून रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे १५ विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. अनुयायांसाठी सलग तीन दिवस रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.


४ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२६० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६२, नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. ५ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.


६ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२५१- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.०० वाजता पोहोचेल. ८ रोजी सुटणारी गाडी क्रमांक ०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२५३ दादर – नागपूर विशेष गाडी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे