मेट्रो-९ चा दहिसर ते काशीगाव पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू होणार

मुंबई : दहिसर-भाईंदर या मेट्रो-९ या मार्गिकेच्या कामाला आता गती आली आहे. या मेट्रो-९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव पहिला टप्पा डिसेंबर अखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. यानुसार नुकतेच आयएसए म्हणजेच स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आता सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्यादृष्टीने लवकरच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा पथकाला पाचरण करण्यात येणार आहे. या पथकाकडून सुरक्षा चाचण्या झाल्यास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि त्यानंतर दहिसर ते काशीगाव मार्गिकेच्या संचलनाचा मार्ग मोकळा होईल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मीरा-भाईंदरवासीयांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.


दहिसर-मीरारोड अंतर कमी करून परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून १३.५ किमी लांबीच्या मेट्रो ९ चे काम सुरु करण्यात आले आहे. ही मार्गिका दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरे थेट मीरा-भाईंदर शहराशी जोडली जाणार आहेत. या मार्गिकेत १० स्थानकांचा समावेश असून मार्गिकेच्या बांधकामासाठी ६६०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव असा ४.५ किमीचा आहे. या टप्प्याचे बांधकाम काम पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वीच या मार्गिकेवरील गाड्यांसह विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली.


आता दहिसर ते काशीगाव टप्प्याला आयएसए अर्थात स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता लवकरच आरडीएसओ प्रमाणपत्र प्राप्त होईल. दुसरीकडे दहिसर ते काशीगाव टप्प्याचे संचलन करण्यासाठीच्या शेवटच्या प्रक्रियेला अर्थात सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध