अधिवेशनातील निर्णयांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार

राज्य सरकारची नवी नियमावली जारी


मुंबई : अधिवेशन काळात मुख्यमंत्री व मंत्र्यांकडून कुठलाही मुद्दा उपस्थित केला जातो. तसेच सभागृहाच्या पटलावर निवेदन व माहिती सादर केली जाते. मुख्यमंत्री व मंत्र्यांकडून बैठकीचे आश्वासन दिले जाते. अशा वेळी मंत्रालयातील संबंधित विभागातील अधिकारी यांनी आदेशाची वाट न पाहता तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. याबाबत शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे.


नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व विभागांना कठोर सूचना जारी केल्या असून, अधिवेशनातील कामकाज अत्यंत गांभीर्याने हाताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघुले यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.


शासन परिपत्रकानुसार, विभागांनी तारांकित आणि अतारांकित प्रश्नांची उत्तरे क्यूआयएस प्रणालीद्वारे वेळेत व परिपूर्ण स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. खुलाशासाठी पाठविलेल्या सूचनांची माहिती तीन दिवसांत विधानमंडळ सचिवालयाकडे पाठवणे आवश्यक असून, अधिवेशनादरम्यान आलेल्या लक्षवेधी सूचनांवरील निवेदने अधिवेशन संपण्यापूर्वी अनिवार्यपणे सादर करावीत. सरकारी विधेयकांवरील चर्चेसाठी मंत्री आणि राज्यमंत्री यांनी समाधानकारक उत्तरे देणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक विधेयकासंबंधी स्वयंस्पष्ट टिप्पणी सचिवांकडून तयार करून मुख्यमंत्री कार्यालयास पाठवावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र