शिक्षिकेची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल

जौनपूर : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे किती पवित्र आणि अनोखं असतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे. शाळेच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवून विद्यार्थी आपल्या ज्ञानात भर टाकतात. शिक्षकांनी जे काही शिकवतात, त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात बदल घडवतात. पालक त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी काबाडकष्ट करतात आणि चांगल्या शाळेत त्यांचं ्डमिशन करतात. पण काही शाळांमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. काही शिक्षक निरागस विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करतात, अशाप्रकारच्या अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्या आहेत. असाच एका शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


त्या शाळेत नेमकं काय घडलं?


जौनपूर बदलापूर पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीत भलुआही येथे एक शाळा आहे. या शाळेत लहान मुलं-मुली वर्गात बसलेले असतात. त्याचदरम्यान एक शिक्षिका या निरागस विद्यार्थ्यांच्या कानशि‍लात लगावते आणि नंतर त्यांना छडीनेही मारते. शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने मारहाण केल्याचं कॅमेरात कैद झाल असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्हिडीओ पाहून यूजर्सने महिला शिक्षिकेवर जोरदार टीका केली आहे.





एका यूजरने हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, मॅडमचा पारा चढला, मुलांना जोरदार मारहाण..जौनपूरच्या बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भलुआहीं येथील पब्लिक स्कूलमध्ये लहान-लहान मुलांना मारहाण करताना मॅडम म्हणत होती, “सगळी जबाबदारी माझीच आहे का!” व्हिडिओ पाहून वाटतंय,घरचा राग मुलांवर काढत आहे का?

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात