धक्कादायक! पुण्यात 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या तरुणाचे टोकाचे पाऊल, अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे: 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर पवार असे या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा मुळचा बुलढाण्याचा रहिवासी असून पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी तो आला होता. सागरने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही आहे. मात्र परिक्षेच्या ताणामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी नोंद करून घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,सागर पवार स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी बुलढाण्याहून पुण्यात आला होता. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर पुण्यात ज्या ठिकाणी राहत होता तो रूम आतून लॉक असल्यामुळे पोलीस दरवाजा तोडून आत शिरले. यावेळी सागर पवार मृत अवस्थेत दिसून आला.




यानंतर पोलिसांनी घटनास्थळी काही पुरावा मिळतो का हे पाहण्यासाठी संपूर्ण रुमचा तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. कोणतीच चिठ्ठी किंवा निशाणी सोडून गेल्याचा कोणताच पुरावा सागरने मागे सोडला नाही आहे. यामुळे तपास करताना पोलिसांना प्राथमिक अंदाजे वर्तवणे सुद्धा कठीण जात आहे. दरम्यान या घटनेत आता सागर पवारचे कुटुंबियांसोबतचे संभाषण आणि मोबाईलची तपासणी यावरून तपास करण्यात मदत होणार आहे. यामुळे कदाचित त्याच्या आत्महत्या मागचे कारण समजणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ