धक्कादायक! पुण्यात 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या तरुणाचे टोकाचे पाऊल, अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे: 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर पवार असे या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा मुळचा बुलढाण्याचा रहिवासी असून पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी तो आला होता. सागरने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही आहे. मात्र परिक्षेच्या ताणामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी नोंद करून घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,सागर पवार स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी बुलढाण्याहून पुण्यात आला होता. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर पुण्यात ज्या ठिकाणी राहत होता तो रूम आतून लॉक असल्यामुळे पोलीस दरवाजा तोडून आत शिरले. यावेळी सागर पवार मृत अवस्थेत दिसून आला.




यानंतर पोलिसांनी घटनास्थळी काही पुरावा मिळतो का हे पाहण्यासाठी संपूर्ण रुमचा तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. कोणतीच चिठ्ठी किंवा निशाणी सोडून गेल्याचा कोणताच पुरावा सागरने मागे सोडला नाही आहे. यामुळे तपास करताना पोलिसांना प्राथमिक अंदाजे वर्तवणे सुद्धा कठीण जात आहे. दरम्यान या घटनेत आता सागर पवारचे कुटुंबियांसोबतचे संभाषण आणि मोबाईलची तपासणी यावरून तपास करण्यात मदत होणार आहे. यामुळे कदाचित त्याच्या आत्महत्या मागचे कारण समजणार आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी