धक्कादायक! पुण्यात 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या तरुणाचे टोकाचे पाऊल, अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे: 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर पवार असे या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा मुळचा बुलढाण्याचा रहिवासी असून पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी तो आला होता. सागरने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही आहे. मात्र परिक्षेच्या ताणामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी नोंद करून घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,सागर पवार स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी बुलढाण्याहून पुण्यात आला होता. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर पुण्यात ज्या ठिकाणी राहत होता तो रूम आतून लॉक असल्यामुळे पोलीस दरवाजा तोडून आत शिरले. यावेळी सागर पवार मृत अवस्थेत दिसून आला.




यानंतर पोलिसांनी घटनास्थळी काही पुरावा मिळतो का हे पाहण्यासाठी संपूर्ण रुमचा तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. कोणतीच चिठ्ठी किंवा निशाणी सोडून गेल्याचा कोणताच पुरावा सागरने मागे सोडला नाही आहे. यामुळे तपास करताना पोलिसांना प्राथमिक अंदाजे वर्तवणे सुद्धा कठीण जात आहे. दरम्यान या घटनेत आता सागर पवारचे कुटुंबियांसोबतचे संभाषण आणि मोबाईलची तपासणी यावरून तपास करण्यात मदत होणार आहे. यामुळे कदाचित त्याच्या आत्महत्या मागचे कारण समजणार आहे.

Comments
Add Comment

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे