राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू

अकोट : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना सोमवार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्देशामुळे राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या अशा वातावरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक धक्कादायक आणि दुःखद बातमी कळली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. अलमास परवीनशेख सलीम असे या महिला उमेदवाराचे नाव होते.


अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अलमास परवीनशेख सलीम निवडणूक लढवत होत्या. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज भरलेल्या पात्र उमेदवाराचा निवडणुकीआधी मृत्यू झाल्यास संबंधित मतदारसंघाची निवडणूक स्थगित केली जाते. यानंतर मृत व्यक्ती ऐवजी इतर कोणी निवडणूक लढवू इच्छीत असल्यास त्यांना एक संधी दिली जाते. एखाद्या पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाला तर संबंधित पक्षाला नवा उमेदवार देण्याची संधी दिली जाते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवा उमेदवार देण्याची संधी मिळणार आहे.


निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार उमेदवारांना १ डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. अपक्षांना बुधवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रचारासाठीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तर, निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळेतही बदल केला असून २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पक्षांना आणि उमेदवारांना दिले आहेत.

Comments
Add Comment

'सूर्या'सेनेचा विजयाचा श्रीगणेश, पहिल्याच सामन्यात अमेरिकेला चारली धूळ

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर अमेरिकेचा २९ धावांनी पराभव

सूर्यकुमारने टी ट्वेंटी विश्वचषकात केला मोठा विक्रम

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान

अमेरिकेच्या एका गोलंदाजासमोर ढेपाळली भारताची फलंदाजी

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी एका गोलंदाजासमोर पुरती ढेपाळली.

सलामीवीर अभिषेक शर्मा केला भलताच विक्रम

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक

पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत