येत्या तीन वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही


मुंबई : येत्या ३ वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विकासाची ब्लू प्रिंट सांगितली. ते म्हणाले पुढील पाच वर्षांमध्ये बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल. मेट्रो-१४ च्या कामासाठी १८ हजार कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो पाचही बदलापूरपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी फडणवीस यांनी बदलापूरकरांना दिला.


बदलापूर - कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. मुंबई लोकल ट्रेनला मेट्रो सारखे कोच लावणार आहोत. मेट्रोसारखे दरवाजे आणि एसी लोकल असेल. त्यात कोणतीही दरवाढ करणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. कांजूरमार्ग- बदलापूर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो ठाण्यातील इतर मेट्रो मार्गाला जोडण्याचा प्लॅन सरकारने केला आहे. ४५ किमीचा मार्ग पुढील ४ वर्षांत मार्गी लागेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी, एलबीएस मार्ग, चिकोली, शीळ फाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ आणि बदलापूर या स्थानकांचा या मार्गावर समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. कांजूरमार्ग ते घणसोलीपर्यंत भूमिगत, नंतर बदलापूरपर्यंत उन्नत असा मार्ग असेल, असेही सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाला १८ हजार कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे.


बदलापूर - कांजूरमार्ग या मार्गावर मेट्रो झाल्यास लोकल मार्गावरील गर्दीवर नियंत्रण येणार आहे. सर्वसामान्यांना गारेगार प्रवास करता येईल. त्याशिवाय मुंबई आणि बदलापूर या दोन शहरातील अंतर अतिशय कमी होईल. कमी खर्चात आलिशान प्रवासाची सोय होणार आहे. बदलापूरहून दररोज हजारो लोक मुंबईमध्ये कामासाठी येतात, त्यांना लोकलच्या गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यात मर्यादित लोकल असल्याने वेळेचे गणितही कोलमडले. पण मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर बदलापूरकरांचा प्रवास आरामदायी तर होणार आहेच. त्याशिवाय गर्दीतून सुटका होणार आहे.

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील