येत्या तीन वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही


मुंबई : येत्या ३ वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विकासाची ब्लू प्रिंट सांगितली. ते म्हणाले पुढील पाच वर्षांमध्ये बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल. मेट्रो-१४ च्या कामासाठी १८ हजार कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो पाचही बदलापूरपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी फडणवीस यांनी बदलापूरकरांना दिला.


बदलापूर - कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. मुंबई लोकल ट्रेनला मेट्रो सारखे कोच लावणार आहोत. मेट्रोसारखे दरवाजे आणि एसी लोकल असेल. त्यात कोणतीही दरवाढ करणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. कांजूरमार्ग- बदलापूर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो ठाण्यातील इतर मेट्रो मार्गाला जोडण्याचा प्लॅन सरकारने केला आहे. ४५ किमीचा मार्ग पुढील ४ वर्षांत मार्गी लागेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी, एलबीएस मार्ग, चिकोली, शीळ फाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ आणि बदलापूर या स्थानकांचा या मार्गावर समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. कांजूरमार्ग ते घणसोलीपर्यंत भूमिगत, नंतर बदलापूरपर्यंत उन्नत असा मार्ग असेल, असेही सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाला १८ हजार कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे.


बदलापूर - कांजूरमार्ग या मार्गावर मेट्रो झाल्यास लोकल मार्गावरील गर्दीवर नियंत्रण येणार आहे. सर्वसामान्यांना गारेगार प्रवास करता येईल. त्याशिवाय मुंबई आणि बदलापूर या दोन शहरातील अंतर अतिशय कमी होईल. कमी खर्चात आलिशान प्रवासाची सोय होणार आहे. बदलापूरहून दररोज हजारो लोक मुंबईमध्ये कामासाठी येतात, त्यांना लोकलच्या गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यात मर्यादित लोकल असल्याने वेळेचे गणितही कोलमडले. पण मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर बदलापूरकरांचा प्रवास आरामदायी तर होणार आहेच. त्याशिवाय गर्दीतून सुटका होणार आहे.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास