Chhattisgarh News : हृदय हेलावणारी घटना! ५ लाखांची खंडणी अन् बांधलेल्या अवस्थेतील फोटो; शिक्षिकेच्या अपहरणाने खळबळ

छत्तीसगड : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग येथील भिलाई शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. येथील एका शिक्षिकेचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले असून, अपहरणकर्त्यांनी तिच्या सुटकेसाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. ही शिक्षिका नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी घराबाहेर पडल्या आणि रिक्षाने शाळेकडे जात होत्या. याचदरम्यान, अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण केले. ही घटना घडल्यानंतर काही तासांतच अपहरणकर्त्यांनी तिच्या पतीला फोन करून त्यांना धमकी दिली. या खंडणीखोरांनी पतीला केवळ फोनच केला नाही, तर आपली पत्नी बांधलेल्या अवस्थेत असल्याचा फोटोही पाठवला. पत्नीचा हा फोटो आणि खंडणीची मागणी ऐकून पती आणि कुटुंबीय प्रचंड घाबरले. त्यांनी वेळ न गमावता तत्काळ भिलाई कॅन्टोन्मेंट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी आणि शिक्षिकेची सुखरूप सुटका करण्यासाठी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.



फोन करून मागितली ५ लाखांची खंडणी


कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला नेहमीप्रमाणे भिलाई सेक्टरमधील तिच्या खासगी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र, ती शाळेत न पोहोचल्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाने तिच्या पतीला फोन केला. पत्नी शाळेत पोहोचली नसल्याचे कळताच पतीला संशय आला आणि त्यांनी लगेच तपास सुरू केला. पती तपास करत असतानाच त्यांना एक अज्ञात कॉल आला. फोनवर असलेल्या अपहरणकर्त्याने स्पष्टपणे सांगितले की, "आम्ही तुमच्या पत्नीचं अपहरण केलं आहे. ५ लाख रुपये घेऊन या, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील." या क्रूर अपहरणकर्त्यांनी केवळ धमकी दिली नाही, तर पुरावा म्हणून महिलेचा बांधलेल्या अवस्थेतील फोटो देखील पाठवला. यामुळे घाबरलेल्या पतीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास वेगाने सुरू केला आहे.



केवळ खंडणीसाठी की अन्य कारण?


या घटनेची तक्रार मिळताच, दुर्ग पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली. एसीसीयू टीम आणि कॅन्टोन्मेंट पोलीस स्टेशनच्या पथकांनी तांत्रिक आणि मानवी संसाधनांच्या आधारे संयुक्त तपास सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी एका संशयित रिक्षा चालकाला शोधून काढले आणि त्याला ताब्यात घेतले. संशयित रिक्षा चालकाची कसून चौकशी केल्यानंतर, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अपहरण झालेल्या शिक्षिकेला सुरक्षितपणे शोधून काढले. महिलेला सुखरूप पाहून तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सुरुवातीच्या तपासात या रिक्षा चालकानेच खंडणीसाठी शिक्षिकेचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. मात्र, ही घटना केवळ पैशांसाठी घडली होती की यामागे काही इतर गंभीर हेतू होता, याचा तपास पोलीस आता करत आहेत. पोलीस सध्या आरोपी रिक्षा चालकासह महिलेचीही कसून चौकशी करत आहेत. या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या