सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक आणि दूषित पाण्यामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे ही नदी प्रदूषित झाल्याने शेतकऱ्यांसह मच्छिमारांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होत आहे.


एमआयडीसी परिसरातील अनेक रासायनिक कारखान्यांकडून उपचार न केलेले दूषित पाणी थेट नदी पात्रात सोडले जाते. या रसायनांमुळे नदीचे पाणी काळवंडण्याबरोबरच नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यातच भरती-ओहोटीच्या काळात हेच पाणी भातशेतीत येऊन परिणामी पिके सुकतात व शेतीचे उत्पादन घटते. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीतील माशांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी झाले आहे. “पूर्वी आमच्या जाळ्यात दिवसाला बरेचसे मासे यायचे, आता मात्र नदीत जीवच उरलेला नाही. उरलेले मासेही विषारी झाल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी `दैनिक प्रहार’शी बोलताना दिली.


दुसरीकडे हवेत सोडल्या जाणाऱ्या रसायनी गॅसमुळे परिसरात श्वसनाचे, दम्याचे, डोळ्यांच्या जळजळीचे आजार वाढले आहेत. मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना या प्रदूषणाचा फटका बसत आहे. धाटाव एमआयडीसीकडून रोजगार, ठेके किंवा इतर कोणत्याही स्वरूपात स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही, मात्र त्याच एमआयडीसीच्या दूषित पाण्याचा फटका मात्र या भागातील लोकांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान कोळी समाजाचे काही नेत्यांसह लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नावर मौन बाळगत असल्याची चर्चा रोह्यात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करून दोषी कारखान्यांवर कडक कारवाई करावी, तसेच नदी शुद्धीकरणासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद

मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा

Budget Session : डहाणूतील 'त्या' प्रकरणावर विधानपरिषदेत पडसाद; दोषी डॉक्टरांचे निलंबन

- आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक सक्तीचे होणार! मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य

ब्राझीलमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

ब्राझीलमध्ये निसर्गाचा भीषण कहर पाहायला मिळत आहे. दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि

'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

मुंबई : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी 'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे