रेल्वेतील चहा-नाश्त्यावर आयआरसीटीसीची नजर

मुंबई  : रेल्वे प्रवासात चहा, नाश्ता किंवा पाणी विकत घेताना छापील दरापेक्षा जादा पैसे आकारले जात असल्याच्या अनेक प्रवाशांच्या तक्रारी असतात. त्यावर उपाय म्हणून आयआरसीटीसी रेल्वे डब्यातील सर्व कर्मचाऱ्यांना एकसमान गणवेश, हेल्पलाइन क्रमांक आणि क्यूआर कोड असलेले ओळखपत्र अनिवार्य करणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी पदार्थांचे निश्चित दर तपासू शकतील आणि थेट ऑनलाइन पेमेंटही करू शकतील.


रेल्वेच्या पश्चिम विभागात प्रवाशांच्या दररोज सरासरी १०० ते १२० तक्रारी येतात. त्यापैकी जवळपास निम्म्या तक्रारी जादा रक्कम आकारण्याबाबत असतात. सुट्टीचा हंगाम आणि पर्यटनाचा काळ लक्षात घेऊन तक्रारी कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.


त्यानुसार प्रीमियम गाड्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गडद निळ्या रंगाचे जॅकेट, तर इतर सर्व गाड्यांतील कर्मचाऱ्यांसाठी फिकट निळ्या रंगाचे टी-शर्ट देण्यात येणार आहेत. या गणवेशावर आयआरसीटीसीचा हेल्पलाइन क्रमांक स्पष्टपणे नमूद असेल आणि क्यूआर कोड असलेले ओळखपत्रही सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. डब्यात सेवा देताना गणवेश परिधान करणे आणि ओळखपत्र लावणे सक्तीचे असेल.


मेनू, पदार्थांचे छापील दर दिसणार


क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रवाशांना मेनू, पदार्थांचे छापील दर तसेच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून जादा रक्कम मागण्याची शक्यता कमी होणार आहे. तसेच तक्रार नोंदवताना प्रवाशांकडे अधिक पुरावा उपलब्ध राहणार आहे.


समाज माध्यमांवरील तक्रारी आघाडीवर


फोन, ई-मेल, तक्रारपुस्तिका आणि समाजमाध्यमे या सर्व माध्यमांतून तक्रारी येतात. यापैकी समाजमाध्यमांवर सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या जातात; मात्र अनेक तक्रारी अपुऱ्या माहितीसह असल्याने निवारणात अडचणी येतात. काही वेळा खोट्या तक्रारीही येतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन गणवेश आणि डिजिटल पडताळणी प्रणाली लागू झाल्यावर प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास आयआरसीटीसीने दिला आहे.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला