रेल्वेतील चहा-नाश्त्यावर आयआरसीटीसीची नजर

मुंबई  : रेल्वे प्रवासात चहा, नाश्ता किंवा पाणी विकत घेताना छापील दरापेक्षा जादा पैसे आकारले जात असल्याच्या अनेक प्रवाशांच्या तक्रारी असतात. त्यावर उपाय म्हणून आयआरसीटीसी रेल्वे डब्यातील सर्व कर्मचाऱ्यांना एकसमान गणवेश, हेल्पलाइन क्रमांक आणि क्यूआर कोड असलेले ओळखपत्र अनिवार्य करणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी पदार्थांचे निश्चित दर तपासू शकतील आणि थेट ऑनलाइन पेमेंटही करू शकतील.


रेल्वेच्या पश्चिम विभागात प्रवाशांच्या दररोज सरासरी १०० ते १२० तक्रारी येतात. त्यापैकी जवळपास निम्म्या तक्रारी जादा रक्कम आकारण्याबाबत असतात. सुट्टीचा हंगाम आणि पर्यटनाचा काळ लक्षात घेऊन तक्रारी कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.


त्यानुसार प्रीमियम गाड्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गडद निळ्या रंगाचे जॅकेट, तर इतर सर्व गाड्यांतील कर्मचाऱ्यांसाठी फिकट निळ्या रंगाचे टी-शर्ट देण्यात येणार आहेत. या गणवेशावर आयआरसीटीसीचा हेल्पलाइन क्रमांक स्पष्टपणे नमूद असेल आणि क्यूआर कोड असलेले ओळखपत्रही सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. डब्यात सेवा देताना गणवेश परिधान करणे आणि ओळखपत्र लावणे सक्तीचे असेल.


मेनू, पदार्थांचे छापील दर दिसणार


क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रवाशांना मेनू, पदार्थांचे छापील दर तसेच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून जादा रक्कम मागण्याची शक्यता कमी होणार आहे. तसेच तक्रार नोंदवताना प्रवाशांकडे अधिक पुरावा उपलब्ध राहणार आहे.


समाज माध्यमांवरील तक्रारी आघाडीवर


फोन, ई-मेल, तक्रारपुस्तिका आणि समाजमाध्यमे या सर्व माध्यमांतून तक्रारी येतात. यापैकी समाजमाध्यमांवर सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या जातात; मात्र अनेक तक्रारी अपुऱ्या माहितीसह असल्याने निवारणात अडचणी येतात. काही वेळा खोट्या तक्रारीही येतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन गणवेश आणि डिजिटल पडताळणी प्रणाली लागू झाल्यावर प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास आयआरसीटीसीने दिला आहे.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने