नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची आघाडी तर मविआची पिछाडी

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना सोमवार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्देशामुळे राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभांमध्ये आघाडी घेतली आहे. प्रचारसभांच्या बाबतीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे मागे पडले आहेत.


राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराकरिता पायाला चाकं लावल्याप्रमाणे वेगाने फिरत आहेत तर मविआच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे शिउबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते हवालदील झाले आहेत. स्थानिक स्तरावरच्या निवडणुकीत फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे बोलले. उद्धव यांची मविआच्या इतर नेत्यांनीही री ओढल्याचे दिसते. याउलट महायुतीचे नेते प्रचारसभा घेत फिरत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.




  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभा : २५

  2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सभा : ३९

  3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या सभा : २७


उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सभा


नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी एकही सभा घेतलेली नाही. नेत्यांच्या प्रचारसभा होत नसल्यामुळे मविआतील घटक पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्तेच धावपळ करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती