चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि इतर साहित्य सामग्रीची आकडेवारी अंतिम करण्यात आली आहे. तसेच एकूण १२५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.


जिल्ह्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण १ लाख १६ हजार ६६० मतदार आहेत. यामध्ये ५९,७५६ पुरुष आणि ५६,८७२ महिला मतदार आहेत. तर ३२ 'इतर' मतदारांचा समावेश आहे. एकूण १२५ मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ५६ बूथ पालघर नगर परिषदेत असून येथील निवडणुकीत ५५ हजार ७२७
मतदार आहेत.


डहाणू नगर परिषदेत ४१ बूथ असून, ३८ हजार ६९३ मतदार, वाडा नगरपंचायतीत १७ बूथ १२ हजार ८९३ मतदार, तर जव्हार नगर परिषद ११ बूथसाठी ९ हजार ३४७ मतदार आहेत. दरम्यान,या निवडणुकीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि ईव्हीएम युनिट्स १० टक्के राखीव साठ्यासह उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी एकूण १३८ कंट्रोल युनिट्स आणि १३८ बॅलेट युनिट्सची गरज आहे. यासोबतच मतदारांना खात्री देणाऱ्या २०८ व्हीव्हीपॅट मशीन आणि ३८० ईव्हीएम बॅटरीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Palghar Accident : शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

पालघर:  पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर एक भीषण अपघात (Accident) घडला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या