नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

८६४ रहिवाशांना घरांची प्रतीक्षा


मुंबई  : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील ८६४ रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली आहे. मात्र त्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. म्हाडाने ही घरे उभारली असून संपूर्ण काम झाले आहे. संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रही (ओसी) मिळाली आहे. मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असल्याने म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने चावीवाटप रखडले असल्याची चर्चा आहे.


वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. नायगाव बीडीडी येथील ४२ चाळींचा पुनर्विकास करून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्र. ८ मधील टॉवर क्र. ४ ते ८ या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून, ८६४ रहिवाशांना चावीवाटप केले जाणार आहे.


सुरुवातीला दिवाळीत संबंधित रहिवाशांना चावीवाटप करण्याचे म्हाडाचे नियोजन होते, मात्र तांत्रिक कारणामुळे ओसी न मिळाल्याने तो मुहूर्त हुकला होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओसी येताच म्हाडाने चावीवाटपाची तयारी करीत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. त्यानुसार सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र काही कारणास्तव ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्याला आता १५ दिवस झाले तरी चावीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही. त्यामुळे नव्या घरांचा ताबा कधी मिळणार, याकडे बीडीडीवासीयांचे डोळे लागले आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची