नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

८६४ रहिवाशांना घरांची प्रतीक्षा


मुंबई  : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील ८६४ रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली आहे. मात्र त्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. म्हाडाने ही घरे उभारली असून संपूर्ण काम झाले आहे. संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रही (ओसी) मिळाली आहे. मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असल्याने म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने चावीवाटप रखडले असल्याची चर्चा आहे.


वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. नायगाव बीडीडी येथील ४२ चाळींचा पुनर्विकास करून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्र. ८ मधील टॉवर क्र. ४ ते ८ या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून, ८६४ रहिवाशांना चावीवाटप केले जाणार आहे.


सुरुवातीला दिवाळीत संबंधित रहिवाशांना चावीवाटप करण्याचे म्हाडाचे नियोजन होते, मात्र तांत्रिक कारणामुळे ओसी न मिळाल्याने तो मुहूर्त हुकला होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओसी येताच म्हाडाने चावीवाटपाची तयारी करीत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. त्यानुसार सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र काही कारणास्तव ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्याला आता १५ दिवस झाले तरी चावीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही. त्यामुळे नव्या घरांचा ताबा कधी मिळणार, याकडे बीडीडीवासीयांचे डोळे लागले आहेत.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त