महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय, जन्मतारखेचा पुरावा म्हणून ‘आधार कार्ड’ ग्राह्य नाही

मुंबई : जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यावर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारने बंदी घातली आहे. बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे तयार होण्याचे प्रकार रोखण्यासाठी आणि अनियमिततेवर नियंत्रण आणण्यासाठी दोन्ही राज्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, आधारचा वापर करून काढलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे की, आधार कार्डाशी कोणतेही जन्म प्रमाणपत्र जोडलेले नसल्याने ते जन्मदाखला म्हणून ग्राह्य धरणे चुकीचे ठरते. विशेष सचिव अमित सिंग बन्सल यांनी सर्व विभागांना या संदर्भातील सूचना पाठवल्या आहेत.


महाराष्ट्र महसूल विभागानेही अशाच प्रकारचे आदेश जारी केले आहेत. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३ लागू झाल्यानंतर आधाराच्या आधारे तयार केलेली प्रमाणपत्रे वैध मानली जाणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले. तसेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी संशयास्पद प्रमाणपत्रे जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


महसूल विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत ११ ऑगस्ट २०२३ नंतर जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणांनंतर जारी करण्यात आलेले उप-तहसीलदारांचे आदेश पुनरावलोकनासाठी मागे घेण्यास सांगितले आहे. योग्य निकषांनुसार नसलेले अर्ज तत्काळ रद्द केले जातील आणि CRS पोर्टलवरील नोंदी हटवण्यात येतील.


निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मात्र सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरण्यास परवानगी दिली आहे. बिहारमधील मतदार याद्यांमध्ये इतर ११ कागदपत्रांसोबत आधारही स्वीकारण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.


सरकारच्या नवीन निर्णयानुसार, जन्म प्रमाणपत्रासाठी आधार पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही. अधिकृत कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. या पावलामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढून बनावट कागदपत्रांचा वापर रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी