सैनिकांच्या कमतरतेमुळे लष्करात अग्निवीरांची ‘घाऊक’ भरती

नवी दिल्ली : भारतीय सैन्यात अंदाजे १.८ लाख सैनिकांची कमतरता असल्याने लष्कराने अग्निवीरांची भरती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४५ हजार ते ५० हजार सैनिकांची वार्षिक भरती एक लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. २०२०-२१ मध्ये कोविड-१९ साथीचा आजार देशात बळावल्याने सैन्य भरती थांबवण्यात आली. या दोन वर्षांत एक लाख ते एक लाख तीस हजार सैनिक निवृत्त झाले आहेत. ज्यावेळी अग्निवीर योजना सुरू करण्यात येणार होती. त्यावेळी पुढील चार वर्षांत सैन्यात अग्निवीरांची भरती हळूहळू वाढवण्याचे नियोजन होते. याची मर्यादा १.७५ लाख होती. नौदल व हवाई दलातील भरतीची आकडेवारीही पुढील चार वर्षांत हळूहळू २८ हजार ७०० पर्यंत वाढवायची होती. अग्निवीर योजनेसह, २०२२ मध्ये कमी संख्येने लष्करात सैनिकांसह भरती सुरू झाली.


Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे