Thursday, November 27, 2025

वाढवण बंदरातील रोजगारात भूमिपुत्रांना प्राधान्य : मुख्यमंत्री

वाढवण बंदरातील रोजगारात  भूमिपुत्रांना प्राधान्य : मुख्यमंत्री

पालघर : पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारे मच्छीमार बांधव आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर कोणतीही गदा येऊ नये, या बाबीचा विचार करूनच वाढवण बंदराचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच तेथील रोजगाराच्या संधीत सुद्धा स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पालघर येथे नगरपरिषद निवडणुक उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी आयोजित सभेत ते बोलत होते

पालघर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत,वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात नवीन प्रकल्पाची विविध कामे हाती घेतली आहेत. विकसित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची नवी ओळख तयार होत आहे. असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. पंतप्रधानांच्या विकासाचा संदेश घेऊन आपण विकासाची वाटचाल करण्याकरिता येथे आलो असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment