नियम धाब्यावर बसवून बांधकाम करणाऱ्या ४० जणांना नोटीस

भाईंदर : धूळ नियंत्रण, बांधकाम सुरक्षेविषयी उपाययोजनांचे पालन न करता इमारतीचे बांधकाम करणाऱ्या शहरातील ४० पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्पांना नोटिस देण्यात आल्या आहेत. नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास इमारत बांधकामे व इतर प्रकल्पांची कामे बंद करून बांधकाम परवानगी रद्द करण्याचा इशारा पालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी दिला आहे. २३ नोव्हेंबरच्या दै. 'प्रहार'च्या अंकात 'भाईंदरमध्ये नियम धाब्यावर बसवून इमारती उभारल्या' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत मिरा-भाईंदर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.


शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेच्या प्रदूषणामध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांना दूषित वातावरणात श्वास घेणेही मुश्कील झाले असून आरोग्य समस्यादेखील वाढल्या आहेत. फुफ्फुस, हृदय, दमा, खोकला व डोळ्यांच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याला बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणाहून येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेने नियमावली जाहीर करून वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक असल्यास काम बंद करण्यात येईल असा इशारा दिला. यावर नजर ठेवण्यासाठी ६ प्रभागांमध्ये भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या अति. आयुक्त, उपायुक्त व सहा. आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नगररचना विभागाकडून ४० बांधकाम प्रकल्पांना नोटिस काढल्या आहेत. उर्वरित प्रकल्पाची पाहणी करून त्यांनाही नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती पुरुषोत्तम शिंदे सहाय्यक संचालक नगर रचना विभाग यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये