नियम धाब्यावर बसवून बांधकाम करणाऱ्या ४० जणांना नोटीस

भाईंदर : धूळ नियंत्रण, बांधकाम सुरक्षेविषयी उपाययोजनांचे पालन न करता इमारतीचे बांधकाम करणाऱ्या शहरातील ४० पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्पांना नोटिस देण्यात आल्या आहेत. नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास इमारत बांधकामे व इतर प्रकल्पांची कामे बंद करून बांधकाम परवानगी रद्द करण्याचा इशारा पालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी दिला आहे. २३ नोव्हेंबरच्या दै. 'प्रहार'च्या अंकात 'भाईंदरमध्ये नियम धाब्यावर बसवून इमारती उभारल्या' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत मिरा-भाईंदर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.


शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेच्या प्रदूषणामध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांना दूषित वातावरणात श्वास घेणेही मुश्कील झाले असून आरोग्य समस्यादेखील वाढल्या आहेत. फुफ्फुस, हृदय, दमा, खोकला व डोळ्यांच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याला बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणाहून येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेने नियमावली जाहीर करून वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक असल्यास काम बंद करण्यात येईल असा इशारा दिला. यावर नजर ठेवण्यासाठी ६ प्रभागांमध्ये भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या अति. आयुक्त, उपायुक्त व सहा. आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नगररचना विभागाकडून ४० बांधकाम प्रकल्पांना नोटिस काढल्या आहेत. उर्वरित प्रकल्पाची पाहणी करून त्यांनाही नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती पुरुषोत्तम शिंदे सहाय्यक संचालक नगर रचना विभाग यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Dombivli News : एकाने डोळे झाकले, दुसरा रील काढत होता अन् तिसरा...मोठागाव-माणकोली पुलावर स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवली : स्टंटबाजी आणि रिल्सच्या नादात स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांना आता पोलिसांचा दणका

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना