IIT बॉम्बे वादावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केली मोठी घोषणा

मुंबई : आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई करावे का, या मुद्द्यावर निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, “आमच्यासाठी हे शहर कायम मुंबईच राहिलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्यात भाजपचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आयआयटी बॉम्बेचं नाव अधिकृतपणे ‘आयआयटी मुंबई’ करण्याची विनंती मी स्वतः पंतप्रधान आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांना करणार आहे.”



जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला


अलीकडेच आयआयटी मुंबईतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, “आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात आलं नाही, हे योग्यच आहे,” असं विधान केलं. त्यांच्या या शब्दांनंतर महाराष्ट्रात संताप उसळला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.


राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले, “बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात पुढाकार भाजपचे दिवंगत नेते राम नाईक यांचा होता. मुंबईच नाव सर्वत्र रूढ व्हावं, ही आमची भूमिका कायम आहे.” त्यांनी पुढे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं, “काही जण स्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात, त्या शाळेचं नाव बदलण्याची मागणी मात्र करत नाहीत.”


ते पुढे म्हणाले, “जितेंद्र सिंह यांचा मुंबई, महाराष्ट्र किंवा गुजरातशी काहीही संबंध नाही. तरीही अशा प्रकारची वक्तव्यं करण्यामागे कोणती प्रवृत्ती आहे, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तमाम मराठी जनतेने आता तरी डोळे उघडावे.”


या वादामुळे ‘IIT Bombay vs IIT Mumbai’ हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, नावांवरील राजकारणाला नव्याने पेटायला सुरूवात झाली आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकच्या दोन महत्त्वाच्या रुग्णालयांसाठी पदनिर्मितीस शासनाची मंजुरी, आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश

Nashik : नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयातील (Sandarbh Services Hospital) पेडियाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी व अर्भक

Indian Team Schedule : जुलै महिन्यात भारतीय संघ किती सामने खेळणार ? जाणून घ्या संपू्र्ण वेळपत्रक; इंग्लंडमध्ये किती सामने होणार ?

मुंबई : भारतीय संघ पुढच्या महिन्यात (जुलै) इंग्लंच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन दिग्गज पुनरागमन करणार

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार कायमस्वरूपी नोंद

Operation Sindoor :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन

Devendra Fadnavis : केतन अग्रवाल खटल्यात उज्ज्वल निकम यांची एन्ट्री

 प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश मुंबई : पुण्यातील लोहगड