IIT बॉम्बे वादावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केली मोठी घोषणा

मुंबई : आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई करावे का, या मुद्द्यावर निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, “आमच्यासाठी हे शहर कायम मुंबईच राहिलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्यात भाजपचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आयआयटी बॉम्बेचं नाव अधिकृतपणे ‘आयआयटी मुंबई’ करण्याची विनंती मी स्वतः पंतप्रधान आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांना करणार आहे.”



जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला


अलीकडेच आयआयटी मुंबईतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, “आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात आलं नाही, हे योग्यच आहे,” असं विधान केलं. त्यांच्या या शब्दांनंतर महाराष्ट्रात संताप उसळला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.


राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले, “बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात पुढाकार भाजपचे दिवंगत नेते राम नाईक यांचा होता. मुंबईच नाव सर्वत्र रूढ व्हावं, ही आमची भूमिका कायम आहे.” त्यांनी पुढे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं, “काही जण स्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात, त्या शाळेचं नाव बदलण्याची मागणी मात्र करत नाहीत.”


ते पुढे म्हणाले, “जितेंद्र सिंह यांचा मुंबई, महाराष्ट्र किंवा गुजरातशी काहीही संबंध नाही. तरीही अशा प्रकारची वक्तव्यं करण्यामागे कोणती प्रवृत्ती आहे, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तमाम मराठी जनतेने आता तरी डोळे उघडावे.”


या वादामुळे ‘IIT Bombay vs IIT Mumbai’ हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, नावांवरील राजकारणाला नव्याने पेटायला सुरूवात झाली आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक