IIT बॉम्बे वादावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केली मोठी घोषणा

मुंबई : आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई करावे का, या मुद्द्यावर निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, “आमच्यासाठी हे शहर कायम मुंबईच राहिलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्यात भाजपचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आयआयटी बॉम्बेचं नाव अधिकृतपणे ‘आयआयटी मुंबई’ करण्याची विनंती मी स्वतः पंतप्रधान आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांना करणार आहे.”



जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला


अलीकडेच आयआयटी मुंबईतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, “आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात आलं नाही, हे योग्यच आहे,” असं विधान केलं. त्यांच्या या शब्दांनंतर महाराष्ट्रात संताप उसळला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.


राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले, “बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात पुढाकार भाजपचे दिवंगत नेते राम नाईक यांचा होता. मुंबईच नाव सर्वत्र रूढ व्हावं, ही आमची भूमिका कायम आहे.” त्यांनी पुढे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं, “काही जण स्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात, त्या शाळेचं नाव बदलण्याची मागणी मात्र करत नाहीत.”


ते पुढे म्हणाले, “जितेंद्र सिंह यांचा मुंबई, महाराष्ट्र किंवा गुजरातशी काहीही संबंध नाही. तरीही अशा प्रकारची वक्तव्यं करण्यामागे कोणती प्रवृत्ती आहे, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तमाम मराठी जनतेने आता तरी डोळे उघडावे.”


या वादामुळे ‘IIT Bombay vs IIT Mumbai’ हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, नावांवरील राजकारणाला नव्याने पेटायला सुरूवात झाली आहे.

Comments
Add Comment

अहमदाबादमध्ये भारताचा विजयी चौकार

शिवमचा झंझावात आणि चक्रवर्तीची फिरकी नेदरलँड्सवर १७ धावांनी मात अहमदाबाद  : अहमदाबादच्या मैदानावर भारतीय

शिवजयंतीच्या पर्वावर महसूलमंत्र्यांची महत्वाकांक्षी घोषणा

एका दिवसात निकाली काढणार पंधरा महसूल सेवा * 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर * राज्यातील सर्व मंडल,

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील कंत्राटदाला ५० लाखांचा दंड

दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूलाच्या कामांत दिरंगाई मुंबई (विशेष

कन्नमवार नाल्याची भिंत उभारण्याचा मार्ग मोकळा, ३९ बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी येथील कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे

मुंबईत भव्य प्रवेशव्दार व क्लॅाकटॅावर उभारा, महापौर रितू तावडे यांनी आयुक्तांना सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत

शिवम दुबेचे अर्धशतक, भारताने नेदरलँडला दिले एवढे मोठे आव्हान

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरलेला भारत निव्वळ औपचारिकता म्हणून