महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके


मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या लेखन कौशल्य व अस्खलित संभाषणाकरीता व्याकरणाची गरज आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुलांचे भाषेचे व्याकरण चांगले व्हावे याकरता आता इयत्ता ५वी व इयत्ता ८वी च्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरीता व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलुगू आणि कन्नड अशा ०८ विविध माध्यमाच्या १०४८ प्राथमिक तसेच १४७ माध्यमिक शाळा अशा एकूण ११९५ शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांमधून शिकत असणा-या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षित शिक्षक, अन्य मनुष्यबळाची तसेच शालेय इमारती, डेस्क-बेंच, फळे, शारीरिक शिक्षण साहित्य अशा भौतिक साधन सामग्रीची व्यवस्था महानगरपालिका करत असते. याशिवाय शैक्षणिक पुस्तके, अतिरिक्त अवांतर वाचनासाठी वाचनालयाची पुस्तके, नियत कालिके, ई-पुस्तके, डिजीटल कंटेंट इत्यादीही पुरविली जातात.


शासनाच्या स्तरावरस्तरावरून शैक्षणिक धोरण व शालेय अभ्यासक्रम ठरवले जात असल्याने त्याअनुषंगाने अध्ययन-अध्यापन साहित्य उपलब्धही करुन देण्यात येते. त्यानुसार विषयनिहाय अभ्यासक्रम आणि त्यास अनुसुरुन पाठ्यपुस्तिका उपलब्ध करुन दिल्या जातात. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी चालू अर्थसंकल्पिय भाषणांत 'महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे भाषेच्या लेखन कौशल्य व अस्खलित संभाषणाकरीता व्याकरणाची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता ५वी व इयत्ता ८वी च्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरीता व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्याचे जाहिर केले. त्यानुसार आता , महानगरपालिका शाळांतील सर्व माध्यमाच्या इयत्ता ५ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्याकरण पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


यासाठी सुदेव एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली. मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी या चार भाषेच्या व्याकरणाची पुस्तके इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्रूा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या व्याकरणाच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी ५ कोटी ६९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

Comments
Add Comment

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी BMC ने केला ७० हजार कोटींचा खर्च, एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने

Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात

Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या