ठाण्यात तस्कराला बेड्या; पाच कोटींचे चरस पकडले

ठाणे: पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शनवर अली (३८) असे या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ५ कोटी ५० लाखांचे चरस जप्त केले आहे. त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपायुक्त अमरसिहं जाधब, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना साकेत रोड ते बाळकुम पाडा २ दरम्यान एक तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वागळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनवर अन्वर अली वय ३८ वर्ष याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून ५०५ ग्रॅम वजनाचे दहा पाकीट चरस मिळाले. तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता? हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Dombivli News : एकाने डोळे झाकले, दुसरा रील काढत होता अन् तिसरा...मोठागाव-माणकोली पुलावर स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवली : स्टंटबाजी आणि रिल्सच्या नादात स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांना आता पोलिसांचा दणका

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना