पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार तसेच कुटुंबीयांनी त्यांना अंतिम निरोप दिला. धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारकडून २०१२ साली त्यांना पद्मभूषण या नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. परंतु एवढ्या मोठ्या सन्मानानंतरही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. यामागचे कारण आता स्पष्ट झाले आहे.


शासकीय सन्मानासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे समजते. सूत्रांनुसार, धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती प्रशासनाला उशिराने कळवण्यात आली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांकडून अगोदर प्रस्ताव दिला जाणे आवश्यक असते आणि त्यानंतर सरकारी मंजुरी घेतली जाते. मात्र या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी उपलब्ध नसल्यामुळे आणि कुटुंबीयांनीही त्यात स्वारस्य न दाखवल्यामुळे सरकारी सन्मानात अंत्यसंस्कार शक्य झाले नाहीत.


धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी माध्यमांनाही उशिराने समजली. मृतदेह स्मशानभूमीकडे जात असतानाच अनेकांना त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. हेमा मालिनी स्मशानभूमीत थेट पोहोचल्या, तर अमिताभ बच्चन, आमीर खान यांसारखे कलाकारही शेवटचा निरोप देण्यासाठी तेथे दाखल झाले. शाहरुख खान मात्र अंत्यसंस्कारानंतर पोहोचला.


१९९७ मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळवलेल्या धर्मेंद्र यांना २०१२ मध्ये पद्मभूषण बहाल करण्यात आला होता. मात्र आवश्यक शासकीय प्रक्रिया वेळेअभावी पूर्ण न झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारांना राजकीय इतमाम प्राप्त होऊ शकला नाही.

Comments
Add Comment

Powai Lake Overflowing : आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे

Mumbai Rains Traffic : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने शहर ठप्प; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात

Walkeshwar Accident : वाळकेश्वरमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बाबुलनाथ रोडवरील दुर्घटना

मुंबई : वाळकेश्वर (Walkeshwar) परिसरातील बाबुलनाथ रोड (Babulnath Road) येथील सूर्यप्रकाश इमारतीत (Surya Prakash Building) मंगळवारी (३० जून) रात्री

Vijaya Mehta : मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी दिशा आणि असंख्य गुणी कलाकार देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका (Theatre Director)

BMC : रस्ते विकासकामे झाडांच्या मुळांवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे

BMC News : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्या कापल्या

मुंबईतील ४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा (Rain) लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६