मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण मुंबईला थेट वाढवण बंदराशी जोडण्यासाठी ३०० मीटर लांबीचा उन्नत पूल उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा पूल तयार झाल्यानंतर एमएमआरडीएच्या उत्तन–विरार सागरी सेतूला वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट लिंक मिळेल आणि त्यामुळे मुंबईहून वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.


जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) देशातील सर्वात मोठ्या क्षमतेचे वाढवण बंदर उभारत आहे. या बंदराकडे सरळ प्रवेश देता यावा म्हणून NHAI वरोर–तवा जंक्शनदरम्यान विशेष महामार्गाचे बांधकाम करणार आहे. हा महामार्ग थेट वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएच्या मते, हाच द्रुतगती मार्ग उत्तन–विरार सागरी सेतूसोबत जोडल्यास संपूर्ण सागरी कॉरिडॉरमध्ये अत्यंत महत्त्वाचे कनेक्शन तयार होईल.


कसा असेल ३०० मीटर उंचीचा उन्नत पूल ?


उत्तन–विरार सागरी सेतूचा शेवट विरारमधील चिखल डोंगरी भागात आहे.


या ठिकाणापासून काही अंतरावरच वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्ग (VME) जातो.


दोन्ही मार्ग एकमेकांशी प्रत्यक्ष जोडण्यासाठी ३०० मीटर उन्नत पुलाचे बांधकाम केले जाईल.


हा फ्लायओव्हर NHAI उभारणार असून राज्य आणि केंद्र शासनातील अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.


एमएमआरडीएच्या अंदाजानुसार, सागरी किनारा मार्ग, विविध सागरी सेतू, जोड रस्ते, द्रुतगती मार्ग आणि विशेष महामार्ग अशा एकूण सुमारे १२० किमी लांबीचा अखंड, सरळ आणि उच्च-गतीचा मार्ग तयार होणार आहे.
या मार्गामुळे :


दक्षिण मुंबई ते वाढवण बंदर फक्त एका तासात पोहोचता येईल


विरार–वाढवणदरम्यान स्वतंत्र सागरी मार्ग बांधण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च वाचेल


बंदर वाहतूक, औद्योगिक प्रवास, लॉजिस्टिक नेटवर्क आणि मालवाहतुकीला मोठा लाभ मिळेल

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य