संरक्षक कठड्यांना धडकून भोगावनजीक मिनी बस दरीत

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामाग क्रमांक ६६ वर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगाव बुद्रुकनजीक सोमवार पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. स्वारगेट पुणे ते दापोलीपर्यंत जाणारी खासगी मिनी बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे रिफ्लेक्टर नसलेल्या लोखंडी संरक्षक कठडयांना धडक देत लोखंडी कठडयांसह अंदाजे ४५ ते ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील १० प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.


गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर ते खेड दरम्यानच्या भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. पहाटे धुके असल्याने रिफ्लेक्टर नसलेले लोखंडी संरक्षक कठडे चालक सूरज अलकुंटे याच्या नजरेस न पडल्याने या लोखंडी संरक्षक कठडयांना मिनी बसची धडक बसताच लोखंडी कठडेदेखील काँक्रीटने जमिनीत ठासले नसल्याने लोखंडी कठड्यांसह मिनीबस थेट दरीत कोसळली. यावेळी बसमधील प्रवाशांच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलादपूर पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना खेड-कळंबणी येथील रत्नागिरी उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले. खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शामल आंजर्लेकर, काजल शिगवण, दिलीप मोहिते, अमरनाथ कांबळे, दीपाली काचरे, प्रतीक गुरव, प्रिया गुरव, आनंदी नाचरे, सर्वेश गुहागरकर, मुजिब दलाल, मयुरी शिगवण याशिवाय चालक, वाहक तसेच इतर ९ प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.