मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लांबणार? जिल्हा परिषद निवडणुकीवर अजित पवारांचे भाकीत

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा धुरळा पुन्हा एकदा रंगणार असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे . नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू असताना महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चेला वेग आला आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणूक आणखी पुढे ढकलली जाऊ शकते, असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


धाराशिव येथे बोलताना अजित पवार यांनी, जिल्हा परिषद निवडणुका स्थगित होण्याची शक्यता असल्याची माहिती वकिलांकडून मिळाल्याचे सांगितले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची चिन्हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सूचित केले. ओबीसी आरक्षणावरील पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया अडकली आहे आणि अंतिम निर्णयानंतरच पुढील दिशा निश्चित होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या आरोपांवर विविध याचिका दाखल झाल्या असून न्यायालयाने यावरील सीमा स्पष्ट ठेवण्याचा पूर्वीच निर्देश दिला होता. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. मात्र, ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याचे मुद्दे समोर आल्यानंतर निवडणूक वेळापत्रक पुन्हा अनिश्चित झालं आहे.


आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निर्णायक ठरणार असून जिल्हा परिषद निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार यावर चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत इच्छुकांच्या उत्साहावर विर्जन पडल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये