मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लांबणार? जिल्हा परिषद निवडणुकीवर अजित पवारांचे भाकीत

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा धुरळा पुन्हा एकदा रंगणार असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे . नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू असताना महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चेला वेग आला आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणूक आणखी पुढे ढकलली जाऊ शकते, असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


धाराशिव येथे बोलताना अजित पवार यांनी, जिल्हा परिषद निवडणुका स्थगित होण्याची शक्यता असल्याची माहिती वकिलांकडून मिळाल्याचे सांगितले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची चिन्हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सूचित केले. ओबीसी आरक्षणावरील पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया अडकली आहे आणि अंतिम निर्णयानंतरच पुढील दिशा निश्चित होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या आरोपांवर विविध याचिका दाखल झाल्या असून न्यायालयाने यावरील सीमा स्पष्ट ठेवण्याचा पूर्वीच निर्देश दिला होता. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. मात्र, ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याचे मुद्दे समोर आल्यानंतर निवडणूक वेळापत्रक पुन्हा अनिश्चित झालं आहे.


आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निर्णायक ठरणार असून जिल्हा परिषद निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार यावर चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत इच्छुकांच्या उत्साहावर विर्जन पडल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती