कल्याण-डोंबिवली महापालिका भाजप स्वबळावर लढणार? रविंद्र चव्हाणांच्या विधानावरून महायुतीमध्ये पेच असल्याचे चिन्हं

डोंबिवली: डोंबिवलीत मनसे नगरसेवकाच्या प्रभागात विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काल (२३ नोव्हेंबर) उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करतानाचे चव्हाण यांचे विधान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. ‘कामे मार्गी लावण्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.


मागील अनेक दिवसांपासून मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीनंतर आता भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक विकास म्हात्रे यांना खिंडीत गाठण्यासाठी चव्हाण यांनी त्यांच्याच प्रभागात ‘शतप्रतिशत भाजप’चे आवाहन केले. पालिका निवडणुकीत महायुतीला मतदान करा, असे आवाहन करण्याऐवजी त्यांनी भाजपला मतदान करा असे सांगितले. तसेच "केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेत भाजपचे सरकार आले तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील" असे विधान केले. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला असल्याचे स्पष्ट होते.



गेली दहा वर्षे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या म्हात्रे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविंद्र चव्हाण यांनी प्रभागातील विकास कामांसाठी निधी देण्यात आखडता हात घेतल्यामुळे विकासकामे रखडल्याचे आरोप म्हात्रे यांनी केले होते. याच प्रकरणामुळे नाराजी व्यक्त करत चव्हाणांनी पालिका निवडणूकीत म्हात्रेंना आव्हान दिले असल्याचे लक्षात येते. तर यापूर्वी अनेकदा महापौर भाजपचा असावा म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनी महायुतीला विरोध केला होता. मात्र शिवसेनेने महापौर महायुतीचा असेल असे नमूद केले होते. मात्र डोंबिवलीत सुरू असलेल्या प्रचारावरून भाजप स्वबळावर लढणार असून महापौर पदासाठी कठोर प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान