म्हाडाच्या वसाहतीतील एकल इमारतींच्या पुनर्विकासाला यापुढे परवानगी नाही

मुंबई : राज्य शासनाने म्हाडाच्या अभिन्यासात एकत्रित पुनर्विकासास पात्र असलेल्या परिसरात यापुढे एकल इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी न देण्याचे धोरण जारी केले आहे. म्हाडाचे ११४ अभिन्यास असून ५६ वसाहती आहेत. रहिवाशांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतुने एकत्रित पुनर्विकास व्हावा, या दिशेनेच यापुढे म्हाडा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


राज्य शासनाने म्हाडाच्या एकत्रित पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे म्हाडाला आता 'बांधकाम आणि विकास संस्थे'मार्फत (सी ॲॅण्ड डी एजन्सी) निविदेद्वारे विकासक नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याधी विविध अभिन्यासात अनेक एकल इमारतींना पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. सध्या म्हाडाने एकल इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी दिलेली नाही. आता नव्याने जाहीर केलेल्या धोरणात यापुढे अभिन्यासात एकत्रित पुनर्विकास होत असेल तर एकल इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी दिली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. पत्राचाळ प्रकल्पाच्या झालेल्या दुरवस्थेचा रहिवाशांनी धसका घेतला आहे. एकत्रित पुनर्विकासामुळे आमच्यावर तशी पाळी येऊ नये, अशी अपेक्षा रहिवाशी व्यक्त करीत आहेत.


आतापर्यंत म्हाडाने एक-दोन इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी दिल्यामुळे पायाभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित झाला होता. म्हाडा इमारती १९७० च्या आसपास बांधण्यात आल्या होत्या. त्यावेळी उभारण्यात आलेल्या तुटपुंज्या पायाभूत सुविधा आता पुरेशा नाहीत. एकत्रित पुनर्विकास झाला, तर रहिवाशांना एकल पुनर्विकारहिवासाच्या तुलनेत नक्कीच मोठे घर मिळणार आहे.


आतापर्यंत म्हाडाने मोतीलाल नगर (गोरेगाव), अभ्युदयनगर (काळाचौकी), वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर (वरळी), सरदार वल्लभभाई पटेल नगर (अंधेरी पश्चिम) या वसाहतींचा पुनर्विकास सी अॅॅण्ड डी एजन्सीमार्फत करण्याचे ठरविले आहे. या वसाहतीत अभ्युदयनगर वगळता अन्यत्र एकल इमारतींच्या पुनर्विकासासाठी परवानगी दिली होती. हा परिसर वगळून आता एकत्रित पुनर्विकासासाठी परवानगी दिली जाणार असले तरी परिसरात एकसंधता राहावी यासाठी नियमावली तयार करण्याचे अधिकार म्हाडाला बहाल करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा