भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत घेणार आज शपथ!

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत. भारताच्या ५३व्या न्यायमूर्तींचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ सुमारे १४ महिन्यांचा असणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती, बदली आणि पदोन्नतीचे नियमन करणाऱ्या कायद्यानुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते. या परंपरेनुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३वे सरन्यायाधीश होणार आहेत.



न्यायमूर्ती सूर्यकांत यांची ओळख?


न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायधीश म्हणून शपथ घेणार आहेत. संवैधानिक, सेवा आणि नागरी कायद्यातील कौशल्यासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. या कालावधीत त्यांनी भारतातील विविध न्यायालये आणि कायदेशीर संस्थांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.


हरियाणातील हिसार येथे १० फेब्रुवारी १९६२ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि त्याच वर्षी हिसार येथील जिल्हा न्यायालयात सराव सुरू केला.


१९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सराव करण्यासाठी चंदीगडला गेले, जिथे त्यांनी संवैधानिक, सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, बँका आणि उच्च न्यायालयातही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.


९ जानेवारी २००४ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढे ५ ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली.


१२ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत करत होते.

Comments
Add Comment

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन

Rafale Deal: भारताची संरक्षण शक्ती वाढणार; फ्रान्सकडून करणार १०० पेक्षा अधिक राफेल खरेदी

नवी दिल्ली: शत्रुराष्ट्रांच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार

पाकिस्तानी तुरुंगात मृतावस्थेत आढळलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा मृतदेह भारतात आणण्यात आला. त्याचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्या?

दिल्ली: गेल्या महिन्यात पाकिस्तानी तुरुंगात मृतावस्थेत आढळलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा मृतदेह भारतात