१२ वर्षांचा दुरावा संपला; दानवे–लोणीकर पुन्हा एकत्र, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना जालना जिल्ह्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांनी तब्बल १२ वर्षे असलेला अबोला संपवत पुन्हा हातमिळवणी केल्याचे चित्र दिसले. गेली चार दशके पक्षात एकत्र काम करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळापासून मतभेद होते. मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही एकत्र येऊन प्रचाराला वेग दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.


एका कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, “आमचा वाद हा वैयक्तिक नव्हता. कोणत्या कार्यकर्त्याला संधी द्यायची, कोणाला पद मिळावे यावरून मतभेद झाले होते. विरोधकांनी त्याचा फायदा घेतला, पण आता ते सर्व संपले आहे.”


ते पुढे म्हणाले, “भाजपला आम्ही उभं केलं, त्याला बळ दिलं. आता पुन्हा एकत्र येण्यात काहीही आश्चर्य नाही. पुढील निर्णय आम्ही दोघे मिळून घेणार आहोत. हा वाद कार्यकर्त्यांसाठी सुरू झाला आणि आता त्यांच्याच हितासाठी संपवला आहे.”


दानवे यांनी विरोधकांवर टोल लगावत म्हटले, “आम्ही एकत्र आल्याने काहींचा तोल जाईल. जुळू इच्छिणारे जुळतीलच. ही विचारांची लढाई आहे.”


ते पुढे म्हणाले की, ज्या काळात भाजप जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर होता, त्या काळात दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केले. “आज पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे आणि ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, आता कार्यकर्त्यांनीही एकत्र यावं,” असे आवाहन त्यांनी केले.


राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनीही एकजुटीचा संदेश दिला. ते म्हणाले, “जिल्ह्यात भाजप अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे घडवून आणली आहेत. आता पुढील विकास आणि पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत.”

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली