भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेची राजस्थानमध्ये नवी खेळी

जयपूर : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. यानंतर राज्यात भाजपने अनेक ठिकाणी स्वतःची ताकद वाढवण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या. भाजपच्या हालचाली बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली तसच दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर स्वतःची बाजू मांडली. एवढी धडपड करुनही हाती जास्त काही लागत नसल्याचे बघून शिवसेनेने दबावासाठी नवी खेळी केली आहे.

शिवसेनेच्या राजस्थानमधील नेत्यांनी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जास्त जागांची मागणी केली आहे. आमची मागणी पूर्ण होणार नसल्यास राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार करू; असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मागच्या वर्षी राजस्थानमध्ये तीन आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना राजस्थानमध्ये मर्यादीत प्रमाणात सक्रीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागा लढवण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या या इशाऱ्यावर भाजपने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
Comments
Add Comment

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Railway : धावत्या रेल्वेत महिलेची प्रसूती, मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता

भुसावळ : मानवी संवेदनशीलता, तत्परता आणि सेवेची भावना जपत मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफने धावत्या रेल्वेत एका

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीने मध्येच थांववला शो, माफी मागत म्हणाला.. !

एखाद्या नाटकात कलाकाराला प्रेक्षकांमुळे होणारा त्रास हा फारसा नवा नाही. प्रेक्षकांचे वाजणारे फोन आणि मोठ्याने