'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करुन अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली होती. या हल्ल्यात काही विदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाऊंडेशनतर्फे घेण्यात आला असून, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यांनी उपस्थित होते.


फडणवीस यांनी यावेळी दिल्लीतील स्फोटाबद्दल भाष्य केले. दिल्लीत घडवून आणलेला स्फोट हा केवळ एक संकेत होता, प्रत्यक्षात देशभरात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची पाकिस्तानची योजना होती, असे ते म्हणाले. भारताच्या तपास यंत्रणांनी वेळेवर कारवाई करत जवळपास ३००० किलो स्फोटके जप्त केली आणि या कटाला मूळापासून आळा घातला, असे


फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानला भारताविरुद्ध थेट युद्धात पराभव स्वीकारावा लागेल, हे त्यांना माहीत असल्याने ते छद्म युद्धाच्या माध्यमातून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतात. दिल्लीतील स्फोट हा त्यांच्या अस्तित्वाचा दावा करण्यासाठी केलेला प्रयत्न होता, मात्र भारतीय तपास यंत्रणांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे देशातील अनेक शहरांवरील दहशतवाद्यांचा डाव उधळला गेला."धोका अद्याप कायम आहे. पाकिस्तान अशा घटना घडवून जागतिक स्तरावर स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत राहील. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची गरज आहे," असे आवाहन त्यांनी केले.


२६/११ च्या हल्ल्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, तो हल्ला फक्त ताज किंवा ट्रायडेंट हॉटेलांवर नव्हता; तर भारताच्या आर्थिक राजधानीवर आणि सार्वभौमत्वावर लावलेलं थेट आव्हान होतं. जशी ९/११ मध्ये ट्विन टॉवरवर हल्ला करून अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न झाला, तसाच प्रयत्न भारताविरुद्ध करण्यात आला होता.त्यांनी पुढे सांगितले की, २६/११  नंतर भारताने धाडसी पावलं उचलली असती, तर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती. मात्र, मोदी सरकारच्या काळात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ठोस भूमिकेतून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही, हे स्पष्ट करत भारतीय सैन्याला कारवाईसाठी मोकळीक दिली. त्यानंतर भारतीय तीनही दलांनी पाकिस्तानच्या तळांवर घुसून अचूक कारवाया केल्या आणि त्यावर पाकिस्तान काहीही प्रतिकार करू शकला नाही.


ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात भारताची लष्करी क्षमता अधोरेखित झाली आहे, पण हा संघर्ष अद्याप संपलेला नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान छुप्या मार्गाने भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न पुढेही करेल; त्यामुळे सतर्कता हीच सर्वात महत्त्वाची आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या