१७ ठिकाणी दुरंगी लढत, चार ठिकाणी तिरंगी सामना

कर्जत : शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर कर्जत नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंधरा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या सतरा ठिकाणी दुरंगी लढत तर चार अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी निवणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस - उबाठा परिवर्तन आघाडीच्या पुष्पा हरिश्चंद्र दगडे आणि भारतीय जनता पक्ष - शिवसेना - आरपीआय महायुतीच्या डॉ. स्वाती अक्षय लाड यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.


प्रभाग एक ‘अ’मध्ये जयदीप कृष्णा पाटील अपक्ष उमेदवारी लढवीत असल्याने तेथे तिरंगी लढत तर प्रभाग एक ‘ब’मध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग दोन अ आणि ब, प्रभाग तीन अ आणि ब, प्रभाग चार अ आणि ब आणि प्रभाग पाच ‘अ’ मध्ये एकास एक उमेदवार असल्याने सरळ लढत तर प्रभाग पाच ‘ब’ मध्ये उमेश अर्जुन शेलार हे अपक्ष उमेदवार असल्याने तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग सहा अ आणि ब, प्रभाग सात अ आणि ब, प्रभाग आठ अ आणि ब मध्ये सरळ लढत आहे. प्रभाग नऊ अ मध्ये राजेश पिराजी साळुंखे अपक्ष निवडणूक लढवीत असल्यामुळे या प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग नऊ ‘ब’मध्ये दुरंगी लढत आहे. प्रभाग दहा ‘अ’ आणि ‘क’ मध्ये दुरंगी लढत होणार आहे, तर प्रभाग दहा ‘ब’मध्ये नितेश राजेंद्र बाचल अपक्ष उमेदवार असल्याने तिरंगी लढत पाहायला मिळेल.


या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नगराध्यक्षासह काही प्रभागात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनी सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने ते निवडणुकीतून बाहेर पडले. या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी प्रभाग सहा ‘ब’मधील उमेदवार प्रशांत वसंत पाटील यांनी नामनिर्देशन पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दाखल केले मात्र ए बी फॉर्म उबाठा शिवसेनेचा दिल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सुद्धा अर्ज दाखल केल्याने ते निवडणूक रिंगणात राहिले. ते कर्जत परिवर्तन विकास आघाडीकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना २६ नोव्हेंबर रोजी निशाणी मिळणार असल्याने ते सध्या निशाणी विना प्रचार करीत असून त्यांनी रिक्षा निशाणी मागितली आहे. अन्य चार अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावीत असले तरी त्यांना मिळणाऱ्या मतांमुळे अटीतटीच्या लढतीत एखाद्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात २० लाखांची सुपारी देऊन हत्या

पुणे कनेक्शन उघड, १२ आरोपी अटकेत अलिबाग : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निघृण

मापगाव बंगला सशस्त्र दरोड्यात २० लाखांचा ऐवज लंपास

संशयित पोलिसांच्या ताब्यात, उर्वरित आरोपींचा शोध सुरू अलिबाग : मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत परिसरात

सबळ पुराव्यांअभावी आदिवासींचे वनहक्क दावे फेटाळले

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ६ हजार ६५६ जणांचे वनहक्क दावे मंजूर करण्यात आले असून, १ हजार ८०४ दावे फेटाळण्यात आले.

रायगड गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी, ११ महिन्यांत ८९ गुन्ह्यांची उकल

अलिबाग (प्रतिनिधी) : सरत्या २०२५ या वर्षात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दमदार कामगिरी केली

न्यायव्यवस्थेचे डिजिटलायझेशन; जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती

अलिबाग (प्रतिनिधी) : अनेकदा गुन्ह्याच्या खटल्यात पंच, साक्षीदार फितूर झाल्याने खटल्याच्या निकालावर परिणाम होत

सुक्या मासळीची आवक वाढल्याने दर आटोक्यात

अलिबाग : रायगड जिल्हा ताज्या मासळीबरोबरच सुक्या मासळीसाठीही प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यात ठिकाठिकाणी सुक्या