मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल ११ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे.


प्रारूप यादी तपासताना ११,०१,५०५ मतदार दुबार असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे एक लाख मतदारांची नावे तीन किंवा चार वेगवेगळ्या यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या पश्चिम उपनगरांची (४,९८,५९७) असून, पूर्व उपनगरात ३,२९,२१६ आणि मुंबई शहरात २,७३,६९२ दुबार नोंदी आढळल्या आहेत.


मतदारयादीवरील हरकती आणि सूचनांसाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील एकूण मतदारसंख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी असून, त्यापैकी ११ लाखांहून अधिक नावे पुनरावृत्तीची असल्याने निवडणूक आयोग आणि महापालिका या दोघांवरही दुरुस्तीचे मोठे दडपण आले आहे.


महापालिकेने दुबार मतदारांची समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदारयादीत जे मतदार दुबार नोंदले गेले आहेत, त्यांची नावे स्वतंत्रपणे चिन्हांकित करण्यात आली आहेत. अशा मतदारांना स्वतःहून आपले अतिरिक्त नाव वगळण्याची संधी दिली जाणार असून, अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी जर एखाद्या मतदाराची दुबार नोंदणी आढळली, तर त्या व्यक्तीकडून दुसरीकडे मतदान केले नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे मतदारयादीतील चुका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर