तळेगाव दाभाडेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत राडा; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

मावळ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. याच वेळी नगरपरिषद कार्यालयात अनपेक्षितरित्या तणाव वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली, मात्र शहरातील काही भागांत तणावाचे वातावरण दिसून आले.


तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असली तरी भाजप–राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. नेतृत्वपातळीवर दोन्ही पक्षांनी युती कायम ठेवली असली तरी स्थानिक पातळीवर उमेदवारी वाटप, प्रभाग रचना आणि पक्षांतर्गत गटबाजी यामुळे नाराजीत भर पडली आहे.


?si=FnJGJMqlu3fqAja4

तळेगावमध्ये तब्बल १९ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची स्थिती निर्माण झाली असून त्यात राष्ट्रवादीचे १० आणि भाजपचे ९ उमेदवारांचा समावेश आहे. बिनविरोध निवडणुकीनंतरही उर्वरित जागांवर तणाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे.


अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालेली धक्काबुक्की ही किरकोळ चकमक नसून युतीतील विसंवाद आणखी वाढत असल्याचा इशारा असल्याचे स्थानिकांचे मत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचेही समजते. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने परिस्थिती बिघडली नाही, परंतु पुढील टप्प्यांत हा अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होतो का, की समन्वय साधून महायुती निवडणुकीत एकत्रितपणे लढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी मुंबई :

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा - मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या

संजय गांधी.. माधवराव सिंधिया ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले

नवी दिल्ली : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि

अपघातावर राजकारण करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारले

पवार कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घाला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी होऊन सत्य समोर

महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना ममतांनी सुरू केले राजकारण, पवारांनी सुनावले

पुणे : तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अजित पवारांचे बुधवारी सकाळी बारामती