तळेगाव दाभाडेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत राडा; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

मावळ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. याच वेळी नगरपरिषद कार्यालयात अनपेक्षितरित्या तणाव वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली, मात्र शहरातील काही भागांत तणावाचे वातावरण दिसून आले.


तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असली तरी भाजप–राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. नेतृत्वपातळीवर दोन्ही पक्षांनी युती कायम ठेवली असली तरी स्थानिक पातळीवर उमेदवारी वाटप, प्रभाग रचना आणि पक्षांतर्गत गटबाजी यामुळे नाराजीत भर पडली आहे.


?si=FnJGJMqlu3fqAja4

तळेगावमध्ये तब्बल १९ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची स्थिती निर्माण झाली असून त्यात राष्ट्रवादीचे १० आणि भाजपचे ९ उमेदवारांचा समावेश आहे. बिनविरोध निवडणुकीनंतरही उर्वरित जागांवर तणाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे.


अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालेली धक्काबुक्की ही किरकोळ चकमक नसून युतीतील विसंवाद आणखी वाढत असल्याचा इशारा असल्याचे स्थानिकांचे मत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचेही समजते. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने परिस्थिती बिघडली नाही, परंतु पुढील टप्प्यांत हा अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होतो का, की समन्वय साधून महायुती निवडणुकीत एकत्रितपणे लढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

उबाठाने ५ टर्ममधील सव्वालाख कोटींचा हिशेब मुंबईकरांना द्यावा

मंत्री आशिष शेलार यांचे आव्हान; मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या पाच

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना 'दे धक्का'; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, अमित साटम यांच्या उपस्थितीत सोहळा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला

बिहारचे रस्ते विकास मंत्री झाले भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : बिहार सरकारचे रस्ते विकास मंत्री नितीन नबीन हे भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. जे. पी. नड्डा

बजरंग दलाबाबत विजय वडेट्टीवारांची मुक्ताफळे; भाजप-शिवसेनेचे आमदार आक्रमक

नागपूर : "राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकर्‍यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी

मुंबईसह राज्यातल्या २९ महापालिकांसाठी कधी होणार मतदान ?

मुंबई : महापालिका निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.नगर परिषद निवडणुका पार पाडल्यानंतर आता