छापेमारी करत वणीमध्ये मिश्रित कोळसा बनवणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई

यवतमाळ : वणी परिसरातील लालपुलिया भागात निकृष्ट आणि प्रदूषणकारक कोळशाची खुलेआम विक्री करणाऱ्या कोळसा माफियांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने १९ नोव्हेंबरला अचानक छापा टाकत अनेक डेपोंची तपासणी केली आणि गुणवत्ता तपासणीसाठी नमुने जप्त केले. या कारवाईमुळे स्थानिक कोळसा व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून अत्यंत स्वस्त दरात खरेदी केलेला निकृष्ट दर्जाचा कोळसा चांगल्या प्रतीच्या कोळशात मिसळून तो बाजारात उच्च दरात विकला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. मंत्रालयाच्या नियमांनुसार अशा कोळशाची विक्री केवळ निश्चित ‘एंड यूजर’लाच करण्याची परवानगी असताना काही व्यापाऱ्यांनी हे नियम धाब्यावर बसवून हा बेकायदेशीर प्रकार सुरु ठेवला होता.या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. तर गुणवत्ता अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अतिशय कठोर पाऊले उचलली जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे.


या रॅकेटचे धागेदोरे नागपूर आणि चंद्रपूरमधील काही मोठ्या कोळसा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. छत्तीसगडमधून येणाऱ्या कोळशात वणीमध्ये भेसळ करून तो विविध ठिकाणी रवाना केला जात असल्याचा संशय होता. मात्र तपासाचा वेग आणि मिळणारे पुरावे यावरून लवकरच या रॅकेटमध्ये असणाऱ्या बड्या व्यापारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासनाने उशिरा या होईना पण या रॅकेटवर कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Nashik Ring Road : नाशिककरांना 'ट्रॅफिक जॅम' मधून मुक्ती! ६६ किमी लांबीचा रिंग रोड कसा असेल? ८,००० कोटींचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा!

नाशिक : नाशिक शहराचा जसजसा विकास झाला, तसतशी शहरात वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या

Dondaicha Nagar parishad Election : ७३ वर्षांचा इतिहास मोडला! दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; रावल यांनी कोणते 'गुप्त राजकारण' केले?

धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा

परळीमध्ये महायुतीचा गुलाल! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

परळी: राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी

निवडणुकीपूर्वीच भाजपने उधळला विजयाचा गुलाल! २४६ नगरपरिषदांपैकी १०० जागांवर बिनविरोध कमळ फुलले

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या

राजगुरूनगरमध्ये नगरसेवक पदासाठी २२ लाखांपासून एक कोटींची बोली

लोकशाहीची थट्टा असल्याची नागरिकांकडून टीका पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रातील

चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावात जनआक्रोश!

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या