राजगुरूनगरमध्ये नगरसेवक पदासाठी २२ लाखांपासून एक कोटींची बोली

लोकशाहीची थट्टा असल्याची नागरिकांकडून टीका


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत एकत्र असणाऱ्या महायुती व महाविकास आघाडीतही स्थानिक पातळीवर मनोमिलाफ न झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यातूनच केंद्रातील व राज्यातील मित्र असणारे राजकीय व राष्ट्रीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात स्थानिक निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. अनेक भागात नगराध्यक्षपासून नगरसेवकांपर्यंत बिनविरोध निवडून येण्याच्या घटना वाढत असतानाच पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यामध्ये मात्र नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी बोली लावली असून हा आकडा २२ लाखांपासून एक कोटीहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.


राजगुरूनगर येथे नगरसेवक पदासाठी १ कोटी ३ लाखांची, तर महिला नगरसेवक पदासाठी २२ लाखांची बोली लागल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बोलीतून आलेल्या रकमेतून शहराचा विकास करावा, असा एकमुखी निर्णय झाल्याचेही काहीजण बोलत आहेत. नगरसेवक पदासाठी १ कोटी ३ लाखांची बोली लागते, हे निश्चितच लोकशाहीला धोकादायक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. ही लोकशाहीची सरळसरळ थट्टा असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. नगरसेवक पद ग्रामीण भागात आता प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागल्याने स्थानिक भागातील कुबेर मंडळी पद मिळविण्यासाठी तिजोरी रिती करू लागल्याचे राजगुरूनगर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.


नेमका काय प्रकार आहे? : राजगुरुनगर नगर परिषदमधील एक नंबरच्या प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा असून, हा लिलाव सर्वसाधारण जागेसाठी १ कोटी २ लाख, तर महिला राखीव जागेसाठी २२ लाखांवर गेल्याची माहिती आहे. निवडणुकीत अनेक उमेदवार उभे राहणार आणि पैसे खर्च करणार, त्यापेक्षा प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू, असे त्यांनी ठरवले. मात्र बिनविरोध निवडीसाठी कोणी माघार घ्यायला तयार होईना, गावकऱ्यांनी अजब तोडगा काढला. त्यांच्या प्रभागातून सर्वसाधारण व महिला राखीव जागेवरचे दोन्ही उमेदवार लिलावाद्वारे निवडायचे. जे उमेदवार या पदांसाठी जास्त बोली लावतील, त्यांना इतर सर्व उमेदवारांनी पाठिंबा देऊन आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे, असे ठरले आणि झालेही तसेच, इतरांनी भरलेले अर्जही मागे घेतले. या लिलावासाठी गावच्या मंदिरात सर्व उमेदवार आणि गावकरी जमले आणि हा लिलाव पार पडला.

Comments
Add Comment

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)