कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बांधकाम व्यवसाय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्यांना धमकावणे, त्यांच्याकडे खंडणी मागणे अथवा त्यांचे अपहरण करुन सुटकेच्या बदल्यात पैसे मागणे हे प्रकार वाढू लागले आहेत. ताजी घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहे. मुंबईच्या कांदिवलीत चारकोप परिसरात भरदिवसा फ्रेंडी दिलीमा भाई नावाच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. अज्ञाताने फ्रेंडी दिलीमा भाईवर तीन राऊंड फायर केले. गोळीबारात फ्रेंडी दिलीमा भाई गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शेतात पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींना अटक केली.


कांदिवलीच्या चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार झाला. दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या. जखमी झालेल्या फ्रेंडी दिलीमा भाईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार करुन फरार झालेल्यांना अवघ्या काही दिवसांत शोधून काढले. गोळीबाराची घटना १९ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली आणि पोलिसांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतात पाठलाग करुन चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केली आहेत.


मुंबईतील कांदिवलीत राहणारा राजेश रमेश चौहान उर्फ दया (४२), पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये राहणारा सुभाष भिकाजी मोहिते (४४), पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राहणारा मंगेश एकनाथ चौधरी (४०) आणि ठाणे जिल्ह्यातील काशीगावमध्ये राहणारा कृष्णा उर्फ रोशन बसंतकुमार सिंह (२५) या चौघांना पोलिसांनी कांदिवलीच्या चारकोप परिसरात फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली आहे.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Bachchu Kadu : सध्या फक्त 'सचिन' आलेत, लवकरच संपूर्ण क्रिकेट टीम येणार; बच्चू कडूंचा दावा

- ठाकरे गटाच्या पडझडीला संजय राऊतच जबाबदार मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या वेगवान घडामोडी आणि

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.

Shivsena Amey Ghole : मुंबईकरांच्या मदतीसाठी शिवसेना सज्ज; गटनेते अमेय घोले यांनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Rain Alerts : हवामान खात्याचा रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली.