पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या ४,१८६ सदनिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून आता ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण न झालेल्या इच्छुकांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. या योजनांसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेच्या भरण्यासह नोंदवले गेले आहेत. सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा कार्यक्रम ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. अर्जदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा १ डिसेंबर २०२५ पर्यंत संबंधित बँकेच्या वेळेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.


दरम्यान, अनेक अर्जदारांना कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक अडचणींमुळे अडथळे येत असल्याने तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी वाढली होती. नागरिकांच्या या मागणीचा आणि मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाचा विचार करून ही मुदतवाढ “शेवटची संधी” म्हणून देण्यात आल्याचे पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या सोडतीबाबतचे सुधारित वेळापत्रक म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.


म्हाडाच्या पुणे मंडळाने जाहीर केलेली ही सोडत चार प्रमुख गटांत विभागण्यात आली आहे. यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) अंतर्गत १,६८३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) FCFS अंतर्गत २९९ सदनिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिका आणि PMC, PCMC व PMRDA हद्दीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ३,२२२ सदनिकांचा समावेश आहे. या मुदतवाढीमुळे पुण्यात तसेच परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची आणखी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य