महिला राखीव जागेवर पुरुषाचे नामनिर्देशन अर्ज छाननीत वैध

मुंबई  : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून या जागेवर एका पुरुषाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज छाननीतही हा अर्ज वैध झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. सध्या अर्जाची छाननी सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे. या जागेसाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ महिला असून त्यात एका पुरुषाचा उमेदवार अर्ज दाखल झाल्याची बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरपालिका प्रभारी यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमके करत होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यातच सर्व उमेदवारांची प्रभाग निहाय छाननी झाली आहे. मात्र, या छाननीमध्ये ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्याने नेमकी चूक कोणाची झाली? हा प्रश्न निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार