१५ दिवसांत तोडगा न निघाल्याने जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा

सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत


मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी १५ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारच्या एकाही प्रतिनिधीने १५ दिवसांत आपल्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आता दादरच्या कबुतरखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा जैन मुनींनी दिला.


मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली ३ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले. त्यावेळी आझाद मैदानावर जाऊन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन मुनींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही आझाद मैदानावर जैन मुनींची भेट घेण्यासाठी गेले होते. या प्रकरणी १५ दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर जैन मुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सोडले.


जैन मुनी नीलेश यांनी ३ नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईकरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यासाठी पर्यायी जागांचा शोध घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पालिका प्रशासनाने दोन दिवसांत मुंबईतील चार जागांची निवड करून त्या ठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याची परवानगी दिली. दादरच्या कबुतरखान्याबाबत काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे जैन मुनी नीलेश यांनी सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली असून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा दिला आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांना धोका निर्माण होणार नाही व कबुतरांचाही जीव वाचेल अशा पद्धतीने तोडगा काढण्याचे आश्वासन नार्वेकर यांनी दिले होते.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :

Vinayak Raut News : विनायक राऊतांची सून घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राऊत कुटुंबियांचा पाय खोलात; फिरोज बाबा शेखच्या साथीदारालाही अटक मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत(Vinayak