महाआघाडीत खळबळ; भाजपकडून ‘स्वबळा’ची भूमिका ?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भाजपने स्वबळावर पुढे जाण्याचे संकेत पुन्हा स्पष्ट केल्यानंतर मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी ‘‘भाजपला आता कोणाच्या आधाराची गरज नाही’’ अशी भूमिका मांडताच महायुतीतील प्रमुख नेत्यांवर अडचणींचे सावट दाटले आहे.


ऑक्टोबरच्या अखेरीस अमित शाह यांनी केलेल्या विधानानंतर काही दिवसांतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गटात धांदल उडाली. पुण्यातील जमिनीच्या खरेदी प्रकरणामुळे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पुन्हा चर्चेत आले, तर कल्याण–डोंबिवली परिसरातील भाजपच्या आक्रमक राजकारणामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठीही परिस्थिती कठीण झाली. त्यानंतर शिंदे यांनी दिल्लीला धाव घेत अमित शाह यांच्यासमोर स्वतःच्या अडचणी मांडल्या.


महाराष्ट्रात २०१९ पासूनच भाजप २०२९ ची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करू लागले आहे. ही तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेतही अमित शाह यांनी वेळोवेळी दिले आहेत. आता ‘कुबड्यांची गरज नाही’ या विधानाने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांची चिंता वाढली आहे.


भाजपचे धोरण ठरवणारी टीम गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीचे काटेकोर विश्लेषण करत आहे. मित्रपक्षांचा फायदा कोणाला अधिक, भाजपला की मित्रांनाच याचा शोध घेतला जातोय. या विश्लेषणाच्याआधारे २०२९ च्या स्वबळाचा रोडमॅप भाजप आखत आहे. मुंबई वगळता राज्यातील अनेक ठिकाणी भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुका हीच २०२९ साठीची भाजपची ‘लिटमस टेस्ट’ ठरणार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्थानिक पातळीवरील दबावामुळे भाजपसमोर माघार घ्यावी लागली आहे.


राज्यात भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे मतांची टक्केवारी. महाराष्ट्रात २०१४ पासून २०२४ पर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील तीन–तीन फेऱ्यांमध्ये भाजपा फक्त २५ ते २८ टक्क्यांच्या दरम्यानच मतहिस्सा टिकवू शकली आहे. भाजपने २८ टक्क्यांच्या वर एकदाही मजल न मारणे ही पक्षासाठी चिंतेची बाब आहे.


उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात भाजप स्वतःच्या बळावर स्थिर आहे, कारण त्या राज्यांमध्ये पक्षाचा मतहिस्सा अर्थात व्होटशेअर ४० टक्क्यांच्या पुढे असतो. महाराष्ट्रात मात्र हा आकडा गाठणे कठीण ठरत आहे.


आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमधून ४० टक्के मतहिस्सा (व्होटशेअर) मिळवण्याची शक्यता तपासली जाईल. त्यानंतरच भाजप मित्रपक्षांना दूर सारायचे की सहकार्य टिकवायचे, यावर अंतिम निर्णय घेईल.

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून