Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्णव खैरे (Arnav Khaire) नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्णव हा तरुण नेमका कोणत्या महाविद्यालयात शिकत होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे. अर्णव खैरे याने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



नेमकं काय घडलं?


कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी अर्णव खैरे याच्या आत्महत्येमागील कारण अत्यंत धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारे आहे. लोकल ट्रेनमधील वादातून झालेल्या मारहाणीमुळे मानसिक तणावाखाली येऊन अर्णवने टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव खैरे हा मुलुंड येथे कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये धक्का लागला. यातून हिंदी-मराठी बोलण्यावरून काही तरुणांशी त्याचा जोरदार वाद झाला. या वादामुळे चिडलेल्या चार ते पाच जणांनी अर्णवला बेदम मारहाण केली. लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या मारहाणीमुळे मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्देवी घटनेमुळे मराठी तरुणांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. रेल्वेतील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अर्णवला मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करून कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

‘जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ

२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार मुंबई : राज्यातील २९