पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका


नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबध विकोपाला गेले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांचा थेट परिणाम विमान कंपन्यांवर होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांसाठी एअरस्पेस बंद केल्याने एअर इंडियासहित अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवास वेळ तीन तासांपर्यंत वाढला असून इंधन खर्चात २९% वाढ झाली आहे.


एअरस्पेस बंदीमुळे एअर इंडियाला वर्षाकाठी ४५५ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ३ हजार ८०० कोटी इतके नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे नुकसान २०२४-२५ मधील ४३९ मिलियन डॉलरच्या तुलनेत अधिक आहे. या वाढत्या आर्थिक ताणातून सुटण्यासाठी एअर इंडियाने केंद्र सरकारकडे चीनच्या शिनजियांग प्रांतातील हॉटन, काश्गर, उरुमकी मार्गे ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ मिळण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य झाल्यास अमेरिका, कॅनडा आणि युरोपकडे जाणाऱ्या उड्डाणांचे अंतर कमी होईल. यामुळे प्रवासाच्या कालावधीत बचत होईल आणि इंधन खर्चातही मोठी कपात होईल.


लांब पल्ल्याचा प्रवासात तीन तासांनी वाढ, इंधन खर्चात २९ टक्के वाढ, वर्षाला ३,८००  कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज



चीनच्या शिनजियांग प्रांतातील ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ची मागणी


एअर इंडियाच्या मागणीला चीन मान्यता देण्याची शक्यता कमी
एअर इंडिया मागत असलेला शिनजियांगचा रुट जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमधून जातो. येथे पर्वतांची उंची २० हजार फुटांपेक्षा जास्त आहे. या क्षेत्रात डीकंप्रेशनचा (केबिनमधील वायुदाब अचानक कमी होणे) धोका अत्यंत गंभीर मानला जातो. यामुळे, प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण, खिडक्या वा दरवाजे अचानक उघडणे, विमानाच्या संरचनेला नुकसान होणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. ही जोखीम पाहून अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स हा मार्ग टाळतात. याशिवाय हा भाग चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी वेस्टर्न थिएटर कमांडच्या अधिकारात येतो. त्यामुळे हा संवेदनशील ‘मिलिटरी एअरस्पेस’ आहे. अशा परिस्थितीत, चीन या मार्ग वापरण्याची परवानगी देईल का? असा प्रश्न आहे.

Comments
Add Comment

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दोन्ही चिरंजीवांसह दिल्लीत मोदी-शहांच्या भेटीला - आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ‘चाय पे चर्चा’; तटकरेंनी फेटाळल्या विलिनीकरणाच्या चर्चा

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई : सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला

युरोपमध्ये रंगणार मराठी नाट्यकलेचा जागर

मुंबई : मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. भारतातील सर्वांत