नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात बस थेट फलाटावर धडकली अन्... ९ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी

नाशिक : नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात घडलेल्या भीषण अपघातात एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. १८ तारखेला बुधवारी दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला असून, स्थानकात प्रवेश करताना बसचा ब्रेक अचानक निकामी झाला आणि नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाटावर चढली. या धडकेत फलाटावर उभ्या असलेल्या नागरिकांना स्वतःचा बचाव करता न आल्याने मोठी दुर्घटना घडली.


मृत मुलाचे नाव आदर्श बोराडे असून, तो आपल्या कुटुंबासोबत देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी त्याचे कुटुंब सिन्नर बस स्थानकात बसची वाट पाहत उभे होते. मात्र अचानक बस फलाटावर धडकली आणि या धडकेत आदर्शचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.


घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत स्थानकाबाहेर रास्ता रोको केला. त्यांनी वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि बसच्या तांत्रिक तपासणीतील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,