नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात बस थेट फलाटावर धडकली अन्... ९ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी

नाशिक : नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात घडलेल्या भीषण अपघातात एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. १८ तारखेला बुधवारी दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला असून, स्थानकात प्रवेश करताना बसचा ब्रेक अचानक निकामी झाला आणि नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाटावर चढली. या धडकेत फलाटावर उभ्या असलेल्या नागरिकांना स्वतःचा बचाव करता न आल्याने मोठी दुर्घटना घडली.


मृत मुलाचे नाव आदर्श बोराडे असून, तो आपल्या कुटुंबासोबत देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी त्याचे कुटुंब सिन्नर बस स्थानकात बसची वाट पाहत उभे होते. मात्र अचानक बस फलाटावर धडकली आणि या धडकेत आदर्शचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.


घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत स्थानकाबाहेर रास्ता रोको केला. त्यांनी वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि बसच्या तांत्रिक तपासणीतील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील १० पैकी जवळपास ९ एसएमबी एआयला प्राधान्‍य देतात: लिंक्‍डइन संशोधन

मुंबई: मुंबईतील लघु व मध्‍यम आकाराचे व्‍यवसाय (एसएमबी) त्‍यांच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वात आत्‍मविश्वासपूर्ण

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक

शेअर बाजारात प्री ओपन सत्रात सकारात्मक संकेत सेन्सेक्स ३०० व निफ्टी ७३ अंकाने उसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:जागतिक पातळीवरील रॅलीचा फायदा आजही भारतात कायम राहू शकतो. प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३०० अंकांने व

लष्कर प्रमुखांचे विधान आणि पाकिस्तानचा उडाला थरकाप! म्हणाले, भारत कधीही घुसखोरी करू शकतो...

लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने