आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एस. सरताज उद्दीन असे बोगस डॉक्टरचे नाव असून गेल्या २५ वर्षांपासून त्याने हजारो लोकांवर उपचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस डॉक्टरकीचे भांडे फुटल्याने सरताज सध्या फरार झाला आहे. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आसामध्ये संशयित ठिकाणांवर छापे टाकत आहेत.


२००१ ते २०२५ या कालावधीत सरताज उद्दीननं अनेकांवर उपचार केले. पण त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा पदवी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तब्बल २५ वर्षांपासून समाजात उजळ माथ्याने फिरणारा डॉक्टर बोगस असल्याचे समजताच त्याच्याकडून उपचार घेतलेल्यांना चिंता वाटू लागली आहे. तर खोटी ओळख सांगून जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांबाबत प्रशासकीय यंत्रणांना एकदा पण संशय आला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


आसाम काऊन्सिल ऑफ मेडिकल रजिस्ट्रेशनला सरताज उद्दीन विरोधात तक्रार मिळाली होती. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष सरताजच्या दवाखान्याकडे गेल्याने बोनगायगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. अडीच दशकांच्या कालावधीत सरताजने बोनगायगावमध्ये बहुमजली इमारत उभारून स्वत:चा दवाखाना बिनदिक्कतपणे सुरु केला. सरताज उद्दीन एवढा सराईत बोगस डॉक्टर होता की, त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांना त्याच्याबद्दल जराही संशय आला आहे.


दरम्यान आसामच्या काचर जिल्ह्यात २०२५ च्या सुरुवातीला प्रशासनाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम चालू केली होती. बोगस आणि अपात्र डॉक्टरांची धरपकड यावेळी करण्यात आली. ज्यात बोगस डिग्रीच्या आधारे गेल्या १० वर्षांत ५० सी सेक्शन करणाऱ्या एका डॉक्टरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.





Comments
Add Comment

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात