आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एस. सरताज उद्दीन असे बोगस डॉक्टरचे नाव असून गेल्या २५ वर्षांपासून त्याने हजारो लोकांवर उपचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस डॉक्टरकीचे भांडे फुटल्याने सरताज सध्या फरार झाला आहे. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आसामध्ये संशयित ठिकाणांवर छापे टाकत आहेत.


२००१ ते २०२५ या कालावधीत सरताज उद्दीननं अनेकांवर उपचार केले. पण त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा पदवी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तब्बल २५ वर्षांपासून समाजात उजळ माथ्याने फिरणारा डॉक्टर बोगस असल्याचे समजताच त्याच्याकडून उपचार घेतलेल्यांना चिंता वाटू लागली आहे. तर खोटी ओळख सांगून जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांबाबत प्रशासकीय यंत्रणांना एकदा पण संशय आला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


आसाम काऊन्सिल ऑफ मेडिकल रजिस्ट्रेशनला सरताज उद्दीन विरोधात तक्रार मिळाली होती. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष सरताजच्या दवाखान्याकडे गेल्याने बोनगायगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. अडीच दशकांच्या कालावधीत सरताजने बोनगायगावमध्ये बहुमजली इमारत उभारून स्वत:चा दवाखाना बिनदिक्कतपणे सुरु केला. सरताज उद्दीन एवढा सराईत बोगस डॉक्टर होता की, त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांना त्याच्याबद्दल जराही संशय आला आहे.


दरम्यान आसामच्या काचर जिल्ह्यात २०२५ च्या सुरुवातीला प्रशासनाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम चालू केली होती. बोगस आणि अपात्र डॉक्टरांची धरपकड यावेळी करण्यात आली. ज्यात बोगस डिग्रीच्या आधारे गेल्या १० वर्षांत ५० सी सेक्शन करणाऱ्या एका डॉक्टरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.





Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या