अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित करण्यात येत आहे. गोरेगाव मुलंड लिंक रोडवर अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यावरील भागात मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक उपाय मास्टीक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे.



पश्चिम व पूर्व उपनगरातील गोरेगाव मुलुंड लिंक रोड येथे अतिक्रमण मुक्त केलेल्या ठिकाणी शिल्लक पॅचेत्त व अतिरिक्त पट्टयांची मास्टिक अस्काल्ट वापरुन सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यांच्या ठराविक भाग खराब झाल्याने तसेच व इतर ठिकाणी मास्टिक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे. या कामांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या करता रणुजा देव कॉर्पोरेशनची यासाठी निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून बॅड पॅचेसची कामे केली जाणार आहे. ज्यामुळे अनधिकृत बांधकाम केल्यामुळे रस्त्याचा जो भाग खराब झाला आहे, त्यावर मास्टिक अस्फाल्टने बनवल्याने वाहतुकीसाठी आता या मार्गावर सुरळीत प्रवास करता येणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही