अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित करण्यात येत आहे. गोरेगाव मुलंड लिंक रोडवर अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यावरील भागात मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक उपाय मास्टीक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे.



पश्चिम व पूर्व उपनगरातील गोरेगाव मुलुंड लिंक रोड येथे अतिक्रमण मुक्त केलेल्या ठिकाणी शिल्लक पॅचेत्त व अतिरिक्त पट्टयांची मास्टिक अस्काल्ट वापरुन सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यांच्या ठराविक भाग खराब झाल्याने तसेच व इतर ठिकाणी मास्टिक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे. या कामांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या करता रणुजा देव कॉर्पोरेशनची यासाठी निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून बॅड पॅचेसची कामे केली जाणार आहे. ज्यामुळे अनधिकृत बांधकाम केल्यामुळे रस्त्याचा जो भाग खराब झाला आहे, त्यावर मास्टिक अस्फाल्टने बनवल्याने वाहतुकीसाठी आता या मार्गावर सुरळीत प्रवास करता येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक, सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभाग

महापालिकेचे वादग्रस्त कचरा खासगीकरणाचे कंत्राटाची निविदा अंतिम, कंपन्यांनी सुमारे ३२ ते ३४ टक्के अधिक दराने लावली बोली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची शासनाकडे सव्वा तीन हजार कोटींची थकबाकी, महापालिकेच्या पाठपुराव्याला अपयश

मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल २ लाख ३२ हजार कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली. ही

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा