शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो कसोटीच्या पहिल्या सामन्यात फारसा दिसला नाही. सामना झाल्यानंतर शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथून त्याला दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. बीसीसीआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.


बीसीसीआयने ट्विटमध्ये सांगितले की, शुभमन वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो १९ नोव्हेंबरला संपूर्ण संघासोबत गुवाहाटीला जाणार आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर सतत देखरेख ठेवली जात असून उपचारांनुसार दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाईल. यामुळे शुभमन दुसऱ्या कसोटीमध्ये दिसणार की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.



दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर शुभमन गिल खेळला नाही तर त्याची जागा कोण घेणार? कोलकातातील ईडन गार्डन्सवर झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार सरावाला सुरूवात केली आहे. ज्यात साई सुदर्शनने सराव करताना घाम गाळला आणि गिलच्या जागी या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता दिसली. मात्र आता गौतम गंभीर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ