साबरमती तुरुंगात कैद्यांचा आयसिसच्या दहशतवाद्यावर हल्ला; हल्ल्याचा हेतू अस्पष्ट

अहमदाबाद : गुजरातच्या साबरमती तुरुंगात तीन कैद्यांनी तेथील उच्च सुरक्षा कक्षात बंद असलेल्या आयसिस दहशतवादी डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यदवर हल्ला केला. हा हल्ला तुरुंगातील कैदी अनिल खुमान, शिवम वर्मा आणि अंकित यांनी केला असून या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून जखमी दहशतवाद्याला तातडीने अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तिन्ही कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


हल्ला तुरुंगाच्या अत्यंत सुरक्षेसाठी प्रसिद्ध असलेल्या कक्षात घडला, ज्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा केली जात आहे. घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत त्या कैद्याला इतर कैद्यांच्या समूहापासून वेगळं केले. हल्ल्यातील आरोपी कैदी तुरुंगातीलच दहशतवादी गटाशी संबंधित असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


हल्ल्याचे कारण काय?


सुरक्षेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या कैद्यांचा मुख्य उद्देश त्यांना आयसिस संघटनेसाठी 'भरती' करणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित करणाऱ्या कैद्याला शारिरीक इजा पोहोचवणं हा होता.


तुरुंगाच्या सुरक्षेत सुधारणा


या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने त्वरित तुरुंगातल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. तुरुंगात सुरक्षेसाठी अधिक CCTV कॅमेरे आणि गुप्त गस्तीसाठी अतिरिक्त सुरक्षा अधिकारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

जागतिक अस्थिरता शेअर बाजारात परावर्तित सेन्सेक्स ४१४ व निफ्टी १२० अंकाने कोसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. जागतिक अस्थिरतेचा फटका आजही कायम

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र

मंत्री नितेश राणे यांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार ठाकरे पुत्रांपेक्षा उत्तर भारतीय चांगली मराठी भाषा

उत्तम मुंबईचे स्वप्न महायुतीला बळ देईल?

हवा उत्तर मुंबईची रवींद्र राऊळ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पॅगोडा, मालाडचा समुद्रकिनारा अशी पर्यटन स्थळे